AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

rane vs thackeray : नियम सगळ्यांना एकच, लक्षात असू दे…नक्कलीवरून नितेश राणेंचा पुन्हा इशारा

अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत नक्कल केली. त्यावरुन आता जोरदार राजकारण तापले आहे.

rane vs thackeray : नियम सगळ्यांना एकच, लक्षात असू दे...नक्कलीवरून नितेश राणेंचा पुन्हा इशारा
नितेश राणे, आमदार
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 9:36 PM
Share

मुंबई : राज्यात सध्या नकला करण्यावरून राजकारण तापले आहे. याची सुरूवात झाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी. भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली, त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. त्या नकलेचा वाद थांबला नाही तोवर अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा देत नक्कल केली. त्यावरुन आता जोरदार राजकारण तापले आहे. नितेश राणे यांच्या नकलीला प्रत्युत्तर देत नवाब मलिक यांनी कोंबडीचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता पुन्हा नितेश राणे यांनी आक्रमक ट्विट केले आहे.

नितेश राणे यांचे ट्विट काय?

”यांनी नक्कल केली तर ती ठाकरी भाषा, आम्ही केली तर संस्कृती चे धडे देणार. गेले ते दिवस…नियम सगळ्यांना एकच…लक्षात असुन दे!!!नाहीतर..परत meow meow आहेच !” असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे, त्यामुळे आता या म्याऊ म्याऊच्या घोषणा गाजताना दिसून येत आहेत. अधिवशनाच्या दुसऱ्या दिवशी तर या घोषणावरून गदारोळ झालाच मात्र आज तिसऱ्या दिवशीही हा वाद थांबलेला नाही, राणे आणि ठाकरे यांच्यातले वार-पलटवार सुरूच आहेत.

निलेश राणेंचीही मुख्यमंत्र्यांवर टीका

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर परीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे निधन झाले. पण 1 दिवससुद्धा घरी बसले नाही. कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी झुंजत असताना त्यांनी कधी कामामध्ये तडजोड केली नाही, शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

नवाब मलिक यांचे ट्विट काय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केलाय. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधलाय. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केलाय. त्यामुळे या नकला आणि ट्विटरयुद्ध काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये.

Omicron : राज्यात ओमिक्रॉनचे 20 नवे रुग्ण, नाताळ साधेपणाने साजरा करा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

Video | …जेव्हा हत्ती सोंडेनं त्याला म्हणाला, ‘Thanks यार! तुझ्यामुळे रस्ता क्रॉस करु शकलो’

क्रिप्टोकरन्सी व्हेल : मार्केटच्या किंमतीवर थेट परिणाम, वेळ स्ट्रॅटेजी बदलण्याची?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.