AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णाभाऊ साठेंचे नाव महामानवांच्या यादीत न टाकणे केंद्राचा पूर्वग्रहदुषितपणा-नितीन राऊत

अण्णाभाऊ साठेंना महापुरुष मानण्यास नकार देऊन केंद्र सरकारने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कोट्यवधी अनुयायांचा अवमान केला आहे, अशी संतप्त भावना राऊत यांनी व्यक्त केली आहे.

अण्णाभाऊ साठेंचे नाव महामानवांच्या यादीत न टाकणे केंद्राचा पूर्वग्रहदुषितपणा-नितीन राऊत
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Jan 05, 2022 | 7:43 PM
Share

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्थापन केलेल्या फाउंडेशनला अण्णाभाऊ साठे यांचे नाव माहिती नसावे यावरून या फाउंडेशनच्या कार्यक्षमतेचे वास्तव आणि केंद्र सरकारचा वैचारिक पूर्वग्रहदूषितपणा स्पष्ट होतो,अशी टीका ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचे सरकार सध्या केंद्रात सत्तेत असल्याने त्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावाची एलर्जी असावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडी सरकार पाठपुरावा करेल

अण्णाभाऊ साठेंना महापुरुष मानण्यास नकार देऊन केंद्र सरकारने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील कोट्यवधी अनुयायांचा अवमान केला आहे, अशी संतप्त भावना राऊत यांनी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य जनमानसात आपल्या साहित्याद्वारे पोहोचविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या महामानवांच्या यादीत समाविष्ट केले जावे यासाठी महाविकास आघाडी सरकार पाठपुरावा करेल,असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्यातील पुरोगामी व प्रबोधन परंपरेतील सर्व संत,समाजसुधारक आणि फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सर्व महामानवांची माहिती लवकरच राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला कळविले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

आठवलेंची घोषणा खरी ठरेल का?

माध्यमांनी केंद्र सरकारच्या या शोषित विरोधी मानसिकतेची लक्तरे वेशीवर टांगल्यावर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाचा समावेश महामानवांच्या यादीत करण्याची घोषणा म्हणजे धूळफेक करण्यासाठी सारवासारव असून ही केंद्राला सुचलेली पश्चातबुद्धी असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी व्यक्त केली आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध व्यक्ती नसल्याचे आणि ते महापुरुष नसल्याचे’ केंद्र सरकारच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनने माजी आमदार सुधाकर भालेराव यांना लेखी कळविले. त्यानंतर माध्यमातून ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ यांचे नाव महामानवांच्या यादीत करण्याची घोषणा केली. मात्र आठवले यांच्या घोषणेला मोदी सरकार किती महत्व देते? आठवलेंची घोषणा खरी ठरेल का? असे प्रश्न उपस्थित करून राऊत यांनी याबाबत शंका व्यक्त केली.

“फाउंडेशनचे उत्तर संतापजनक आणि अवमानजनक आहे. अण्णाभाऊ साठेंच्या क्रांतिकारी कार्याची उपेक्षा करण्याचा आणि आंबेडकरी चळवळ देशवासियांना कळू नये असा हेतू तर केंद्र सरकारचा यामागे नाही ना, ही शंका या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकीकडे बाबासाहेबांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे बाबासाहेबांचा विचार आपले साहित्य,पोवाडे आणि प्रत्यक्ष कृती यांच्या माध्यमातून जनतेत लोकप्रिय करणारे अण्णाभाऊ साठे यांचे नावही महामानवांच्या यादीत टाकायचे नाही,हा केंद्र सरकारचा दुटप्पीपणा आहे”,असेही ते म्हणाले.

” ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे,’ असं ठणकावत मनामनांत क्रांतीची ठिणगी पेटविणारे थोर साहित्यसम्राट, महान शाहीर अण्णाभाऊ साठे यांना केवळ भारतातच नव्हे जागतिक पातळीवर ओळखले जाते. त्यांच्या साहित्याचा विविध भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. असे असताना भारत सरकारचेच आंबेडकर फाउंडेशन त्यांना ओळखत नाही ही बाब संतापजनक असून या प्रकाराचा करावा तितका निषेध कमीच आहे. शोषण, अत्याचार आणि जातीव्यवस्थेविरोधात त्यांनी साहित्यातून आवाज उठवला. त्यांचा हा संघर्ष कोट्यवधी दलित शोषित पिडितांसाठी आजही प्रेरणादायी आहे व केंद्र सरकारने त्यांना महामानव मानले नाही तरी ते आमच्यासाठी सदैव महामानव राहतील,” अशी भावना राऊत यांनी व्यक्त केली आहे.

IND vs SA: ‘तरी अजिंक्य रहाणेला संघाबाहेर काढा’, गौतम गंभीरचं रोखठोक मत

Corona Vaccination: मुंबई महानगरात कोविड लसीच्या पहिल्या मात्रेने ओलांडला एक कोटीचा टप्पा!

New Home Isolation Guidelines : होम आयसोलेशनचे नवे नियम जाणून घ्या, थोडक्यात…

Follow Us
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा
सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
Sachin Ahir | सचिन अहिर ॲक्शन मोडवर! थेट वरळीला पोहोचले अन्...
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यादीनाच्या अगदी एका
गृहमंत्री अमित शाहांचा मोठा गौप्यस्फोट! स्वातंत्र्यदिनाच्या अगदी एका दिवसापूर्वी... धक्कादायक माहितीचा खुलासा
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींनी बोलावली तातडीची बौठक; NTA मध्ये मोठा बदल... दिल्लीत हालचाली वाढल्या!
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर...
देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीत जाणार? पंतप्रधानांसोबच्या भेटीची इनसाइड स्टोरी समोर, नेमकं काय ठरलं?
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी,
भाजपाकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, महाराष्ट्रातून कोणाला संधी, वाचा नेमकं काय बदललं?
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...