नि:शब्द ! जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन, कल्याणमधील विदारक वास्तव

कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. (No beds available in Kalyan Dombivali for corona patients).

नि:शब्द ! जीव वाचवण्यासाठी रुग्णांना खुर्चींवर झोपवून ऑक्सिजन, कल्याणमधील विदारक वास्तव
विदारक वास्तव, ऐतिहासिक शहर, लाखोंची वस्ती, कोरोनाबाधितांसाठी एकही बेड शिल्लक नाही
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 11:04 PM

कल्याण (ठाणे) : कोरोनाचं थैमान इतकं भयानक वाढलंय की त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती शब्दांमध्ये सांगता येणार नाही. कल्याणमध्ये तर प्रचंड भयानक परिस्थिती आहे. इथे रुग्णांना बेड मिळणं खूप कठीण झालंय. सरकारी असो किंवा खासगी, सर्वच रुग्णालये फुल झाली आहेत. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत अत्यवस्थ किंवा ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना महापालिका रुग्णालयात पेसेजमध्ये असलेल्या खुर्च्यांवर झोपवून ऑक्सिजन दिला जातोय. ही भयानक परिस्थिती बघून मनाला चटका बसेल. पण हे वास्तव नाकारता येणार नाही (No beds available in Kalyan Dombivali for corona patients).

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. केडीएमसीतील एकूण रुग्णांच्या संख्येने आता एक लाखांचा आकडा पार केला आहे. खाजगी असो किंवा महापालिका रुग्णालय, रुग्णांसाठी बेडच नाही. खाजगी रुग्णालयात इंजेक्शन नाही. परिस्थिती इतकी विदारक आहे की, कल्याणच्या रुक्मीणीबाई रुग्णालयातील पॅसेजमध्ये रुग्णांकरीता बसविण्याची व्यस्था असते. त्याच खुर्च्यांवर आता रुग्णांना झोपवून ऑक्सिजन दिला जात आहे. हे चित्र पाहून सगळ्यांनाच धक्का बसेल.

रुग्णांचा जीव वाचवणं हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचं : आयुक्त

या विदारक परिस्थितीवर केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा त्यांनीदेखील या परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. पण सध्या पर्याय नसल्याने प्रशासनदेखील हतबल असल्याचं त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. प्रशासन आपल्यातर्फे सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, रुग्णवाढ ही प्रचंड वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांचा जीव वाचवणं हेच महत्त्वाचं उद्दीष्ट असल्याचं महापालिका आयुक्तांच्या बोलण्यातून लक्षात आलं.

महापालिका आयुक्त नेमकं काय म्हणाले?

“संशयीत रुग्णांवर रिपोर्ट येण्यापूर्वी उपचार केले जात आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज  आहे, त्यांना ऑक्सिजन दिला जात आहे. रुग्णांचा जीव वाचविणे हेच आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे. उद्या टास्क फोर्सची बैठक घेतली जाणार आहे. वेबीनारच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधून इंजेक्शन, बेड, ऑक्सीजनची उपलब्धता याचा आढावा घेतला जाणार आहे”, अशी प्रतिक्रिया विजय सूर्यवंशी यांनी दिली.

केडीएमसीत कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखांच्या पार

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. केडीएमसीत दिवसभरात 1390 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 1688 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज चार जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : ठाण्यात कोरोना स्थिती चिंताजनक, वॉर रुमचे तीनतेरा; उडवाउडवीची उत्तरं दिल्यामुळे मनसेचा हंगामा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.