AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शासनाने शाळांना अनुदान न दिल्यास नाईलाजाने नक्षली होवू, शिक्षकांचा निर्वाणीचा इशारा

राज्यात विना अनुदानित शाळांचा आणि त्यात काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या शिक्षकांनी निवेदनं, मोर्चा, आंदोलन आणि उपोषणाचा संवैधानिक मार्ग अवलंबून आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

शासनाने शाळांना अनुदान न दिल्यास नाईलाजाने नक्षली होवू, शिक्षकांचा निर्वाणीचा इशारा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 19, 2019 | 5:46 PM
Share

यवतमाळ : राज्यात विना अनुदानित शाळांचा आणि त्यात काम करणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत या शिक्षकांनी निवेदनं, मोर्चा, आंदोलन आणि उपोषणाचा संवैधानिक मार्ग अवलंबून आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, आता या शिक्षकांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य न झाल्यास थेट नक्षली चळवळीत सहभागी होण्याचा इशारा दिला आहे.

मागील 18 वर्षांपासून विनावेतन वेगवेगळ्या कॉलेजमध्ये ज्ञानदानाचे काम करत असलेल्या शिक्षकांनी यवतमाळ येथे आंदोलन केले. यात विना अनुदानित शाळा शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला.

शिक्षकांनी सांगितले, ‘आम्ही ज्या शाळा कॉलेजला शिकवतो त्याला शासनाने अनुदान द्यावे. 18 वर्षांपासून आम्हाला पगार नाही. शासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळेच हे होत आहे. शासनाने आता ईच्छा मरणाची परवानगी द्यावी. त्यानंतर आमच्या कुटूंबाची जबाबदारी शासनाची राहील. मात्र, शासन असं करायलाही तयार नसेल आणि आमची दखलही घेत नसेल तर आम्ही नाईलाजाने टोकाचं पाऊल उचलत नक्षलवादी होण्याचा मार्ग स्वीकारू.

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...