तुम्हाला बघून घेऊ…OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला…

मचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचे आरक्षण वाचवा, अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल. निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

तुम्हाला बघून घेऊ...OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला...
devendra fadnavis and laxman hake
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2026 | 5:27 PM

OBC And Laxman Hake : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने नुकतेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात आता ज्या सोई-सुविधा ओबीसींना लागू असतील त्या सर्व सुविधा आता मराठा समाजाला लागू होणार आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे वेळोवेळी आंदोलन करत आहेत. त्यामुळे मराठा समाज ओबीसीत आला तर मूळ ओबीसींवर अन्याय होईल, अशी भावना ओबीसी बांधवांकडून व्यक्त केली जाते. ओबीसीचींही ही बाजू ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके वेळोवेळी मांडत आले आहेत. दरम्यान, आता याच लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. ओबीसी एकवटला तर सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल, असा इशाराच हाके यांनी दिला आहे.

बीसी एकवटला तर सत्ताधारी…

तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचे आरक्षण वाचवा, अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल. निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणल्यावर देशातला जेन झी, कॉकरोच जनता पार्टीच्या रुपात एकवटले आहेत. आम्ही ओबीसी तर 60 टक्के आहोत. ओबीसी एकवटला तर सत्ताधारी, कारखानदार, भांडवलदार यांना घरी बसावं लागेल, असंही हाके यांनी ठणकावून सांगितले आहे. लक्ष्मण हाके हे सांगलीत बोलत हेते.

भांडवलदार, वतनदारांना घरी बसवू

जे ओबीसींनाते मराठा समाजाला हे आम्हाला मान्य नाही.ज्या दिवशी ओबीसी राजकीय भूमिका घेईल त्यादिवशी तुम्हाला पळता भुई थोडी होईल. ज्या दिवशी ओबीसी म्हणून ओबीसी एकत्र येईल, त्यादिवशी प्रस्थापित भांडवलदार, वतनदारांना घरी बसवू, असंही लक्ष्मण हाके म्हणाले. दरम्यान, मराठा समजाला ओबीसींच्या सर्व सुविधा लागू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर कठोर शब्दांत टीका केली होती. ओबीसी नेता असल्याचे सांगून हे फायदा करून घेणारे नेते आहेत, असा टोला जरांगे यांनी लगावला होता.

Follow Us