AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत’, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अतुल कुलकर्णींची खास पोस्ट

NEET पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीत सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेते अतुल कुलकर्णींचा ठाम पाठिंबा. फेसबुकवर शेअर केली पोस्ट. अनेकजण करत आहेत कौतुक.

'आजच्या परिस्थितीला आम्ही कारणीभूत', विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अतुल कुलकर्णींची खास पोस्ट
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 24, 2026 | 7:13 PM
Share

NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला उघडपणे समर्थन देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा अशी भूमिका मांडली आहे.

सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भाष्य करणारे अतुल कुलकर्णी यांनी यावेळी देशातील युवा पिढीचे कौतुक करत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून अनेकांनी त्यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

अतुल कुलकर्णी यांच्या पोस्टमध्ये काय?

अतुल कुलकर्णी म्हणतात की, ‘आजच्या पिढीने गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुन्हा जिवंत केले आहे. आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढ्यांनी त्यांच्या नावांचा सतत उल्लेख केला, पण त्यांच्या विचारांचे आचरण मात्र आपण विसरत गेलो. शिक्षण, समाज, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांत आपणच आजच्या परिस्थितीस कारणीभूत ठरलो आहोत. आता तरी जबाबदारी स्वीकारून या तरुणांच्या संघर्षाला पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे.’

या पोस्टनंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या विचारांचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अधिकाधिक पाठिंबा देण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात येत आहे.

यापूर्वीही अतुल कुलकर्णी यांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या. एका हिंदी कवितेच्या माध्यमातून त्यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींना थेट प्रश्न विचारत व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर भाष्य केले होते. ‘बीस जुलाई की अगली सुबह…’ या कवितेद्वारे त्यांनी नागरिकांनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज अधोरेखित केली होती.

Atul Kulkarni

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने स्पष्ट भूमिका

अतुल कुलकर्णींसारख्या संवेदनशील आणि अभ्यासू अभिनेत्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही या आंदोलनाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी अधिक तीव्र होताना दिसत आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नावर सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि परीक्षापद्धतीवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांसह अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच