AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला…

बोगस दाखले घेतलेल्यांना जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही - OBC नेत्यांचा आरोप

जरांगेंच्या आंदोलनानंतर आता राज्यात नवा संघर्ष, ओबीसी नेत्याची सर्वात मोठी घोषणा, येत्या 12 तारखेला...
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2026 | 6:08 PM
Share

OBC Protest : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे नुकतेच उपोषणाला बसले होते. ते भर उन्हात उपोषणाला बसल्याने त्यांच्या या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. ज्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रही द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आता याच मागणीवर ओबीसी नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 11 तारखेला आम्ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलं आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्रचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. बोगस दाखले घेतलेल्यांना जात पडताळणी प्रमाण पत्र देण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत, असा ओबीसी नेत्यांचा आरोप आहे. जरांगेच्या भूमिकेचा विरोधात १२ तारखेला OBC नेते रस्त्यावर उतरणार आहेत. याबाबत प्रकाश शेंडगे यांनी भूमिका स्पष्ट केली.जारांगे यांनी आंदोलन केल्यावर सगळ्या गोष्टी मान्य केल्या जातात. पण जरांगे सरकारच्या गळ्यावर चाकू ठेऊन काम करत आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातून येतात. परंतु ते स्वतः मराठ्यांचे काम करत आहेत, असा आरोप शेंडगे यांनी केला. तसेच बावनकुळे यांनी अनेक ओबीसी दाखले हे मान्य केले आहेत. जात पडताळणीचे जे बोगस दाखले ह्यांनी घेतले आहेत. ते मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आंदोलन केले.  त्यामुले येत्या 12 जून रोज आम्ही राज्य व्यापी आंदोलनाची घोषणा करणार आहोत, असेही शेंडगे म्हणाले.

त्याआधी आधी आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावी आणि त्या ठिकाणी आमचं बोलण ऐकून घ्यावं. ज्या कुणबी नोंदी घेण्यात आल्या त्यावर अनेक मंत्री, आमदार, खासदार यांच्या बायकाजपोरांनी जिल्हापरिषद, नगरपरिषद निवडणुका लढावल्या आहेत. त्यांच्या सगळे प्रमाणपत्र मान्य करून घेण्यासाठी हे सगळं चालू आहे.  आता ज्यांनी हे प्रमाणपत्र घेऊन निवडणूक लढवली आहे त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. कोणी सरकार कायम घेऊन राहत नसतं. आता जर आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर येणाऱ्या काळात ओबीसींचा डीएनए काय असतो ते दाखवू, असा इशाराही त्यांनी दिला, त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!