Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावाचा पुढाकारImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 6:05 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील सकमूर हे गाव वर्धा नदीचा (Wardha River) काठावर वसले आहे. एकीकडे वर्धा नदीचे पात्र तर दुसरीकडे जंगल आहे. सकमूर गावातील शेतीला वन्यजीवांचा (Wildlife) नेहमीच धोका असतो. वर्धा नदी शेतकऱ्यांना वरदान आहे. मात्र नदीला पूर आला की शेती मातीमोल होते. शेतीत होणारे नुकसान बघता गावातील शेतकरी शेतीपुरक व्यवसायाकडे वळले आहेत. गावातील 25 शेतकऱ्यांनी शेतातील शेततळ्यात मस्त्यपालन सुरू केले आहे.

आठवड्यातून चार दिवस पकडतात मासे

शेततळ्यातील मासे ताजे असतात. त्यामुळं या माशांना मोठी मागणी आहे. यातून शेतकऱ्यांना बरीच मिळकत होत आहे. ताजे आणि चविष्ट मासे मिळत असल्याने ग्राहकांची याला मोठी मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता दूरवरून घाऊक मासोळी विक्रेते सकमूर गाव गाठतात. आठवड्यातून चार दिवस शेततळ्यातील मासे पकडले जातात.

शेततळ्यांनी उंचावला आर्थिक स्तर

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

हे सुद्धा वाचा

शेती काही भरोश्याची नाही

शेती आता भरवश्याची राहिलेली नाही. हे वाक्य नेहमी कानावर पडते. काही अंशी ते खरं ही आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी यामुळं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टानं बळीराजा शेती फुलवितोय. प्रसंगी कर्ज काढतो. शेतीत अक्षरशः जीव ओततो. मात्र या शेतीची जेव्हा माती होतेय. तेव्हा हा राजा खचतोय. टोकाचा निर्णय घेतो.

कणखर बाणा काही खचत नाही

शेतीवर संकटाची मालिका सुरू असतानाही यातील बहुतांश शेतकरी काही खचत नाहीत. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूरने हेच उदाहरण घालून दिले आहे. असं प्रयोगशील शेतकरी गजानन काळे यांनी सांगितलं. स्थानिक घाऊक मासे विक्रेत्यांनाही योग्य दरात येथे ताजे मासे मिळतात.

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.