AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

Chandrapur Fishing : सकमूर गावातील 25 शेतकरी करीत आहेत व्यवसाय, नदीलगत असलेल्या शेतात 5 शेततळे खोदून सोडले मत्स्यबीज
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावाचा पुढाकारImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 6:05 PM
Share

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी (Gondpimpri) तालुक्यातील सकमूर हे गाव वर्धा नदीचा (Wardha River) काठावर वसले आहे. एकीकडे वर्धा नदीचे पात्र तर दुसरीकडे जंगल आहे. सकमूर गावातील शेतीला वन्यजीवांचा (Wildlife) नेहमीच धोका असतो. वर्धा नदी शेतकऱ्यांना वरदान आहे. मात्र नदीला पूर आला की शेती मातीमोल होते. शेतीत होणारे नुकसान बघता गावातील शेतकरी शेतीपुरक व्यवसायाकडे वळले आहेत. गावातील 25 शेतकऱ्यांनी शेतातील शेततळ्यात मस्त्यपालन सुरू केले आहे.

आठवड्यातून चार दिवस पकडतात मासे

शेततळ्यातील मासे ताजे असतात. त्यामुळं या माशांना मोठी मागणी आहे. यातून शेतकऱ्यांना बरीच मिळकत होत आहे. ताजे आणि चविष्ट मासे मिळत असल्याने ग्राहकांची याला मोठी मागणी आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता दूरवरून घाऊक मासोळी विक्रेते सकमूर गाव गाठतात. आठवड्यातून चार दिवस शेततळ्यातील मासे पकडले जातात.

शेततळ्यांनी उंचावला आर्थिक स्तर

या चार दिवसात सुमारे सात ते आठ क्विंटल मासोळी विकली जाते. सकमूरच्या शेतकऱ्यांनी अनेक शेतीप्रयोग केले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणामुळे त्यांच्या पदरी निराशा पडली. आता तयार केलेल्या पाच शेततळ्यानी त्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.

शेती काही भरोश्याची नाही

शेती आता भरवश्याची राहिलेली नाही. हे वाक्य नेहमी कानावर पडते. काही अंशी ते खरं ही आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, नापिकी यामुळं बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. मोठ्या कष्टानं बळीराजा शेती फुलवितोय. प्रसंगी कर्ज काढतो. शेतीत अक्षरशः जीव ओततो. मात्र या शेतीची जेव्हा माती होतेय. तेव्हा हा राजा खचतोय. टोकाचा निर्णय घेतो.

कणखर बाणा काही खचत नाही

शेतीवर संकटाची मालिका सुरू असतानाही यातील बहुतांश शेतकरी काही खचत नाहीत. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूरने हेच उदाहरण घालून दिले आहे. असं प्रयोगशील शेतकरी गजानन काळे यांनी सांगितलं. स्थानिक घाऊक मासे विक्रेत्यांनाही योग्य दरात येथे ताजे मासे मिळतात.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....