कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत

अतिवृष्टी आणी दरडी कोसळण्याच्या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

कोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत
Uday Samant
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 7:40 PM

रत्नागिरी : अतिवृष्टी आणी दरडी कोसळण्याच्या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभं आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. चिपळूण पंचायत समिती येथे आयोजित नैसर्गिक आपत्तीच्या पाश्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने, विभागीय आयुक्त पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (35 dumpers to be ordered to remove mud in Konkan, workers will come from Mumbai, Navi Mumbai : Uday Samant)

उदय सामंत म्हणाले की, पुराचे पाणी ओसरले असून पाणी ओसरल्यानंतर रोगराई होऊ नये, व्यापाऱ्यांचे सर्व पंचनामे त्यांना त्रास न होता तात्काळ करावेत, यासाठी महसूल यंत्रणा व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना निर्देश दिले आहेत. व्यापाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने फोटोग्राफर, व्हीडीओग्राफर ची व्यवस्था केली असून ते बाजारात फोटो, व्हिडीओ शुटींग करत आहे. व्यापाऱ्यांशीही प्राथमिक चर्चा झाली असून त्यांना जे अपेक्षित आहे ते शासनाकडे मांडू. शासन या आपत्तीमध्ये बाधित झालेल्या प्रत्येकाच्या मागे ठामपणे उभं आहे, असेही ते म्हणाले. अजूनही चिखल मोठया प्रमाणावर असल्याने 30 ते 35 डंपरची आवश्यकता असून त्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मुंबई, नवी मुंबई येथील स्वच्छता करणाऱ्या एजन्सींशी संपर्क साधण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

औषध फवारणीही युध्दपातळीवर सुरु करण्यात येत असून यासाठी ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळया टीम तयार करण्यात आल्या आहेत. महामार्गावरुन उद्या संध्याकाळपर्यंत कमी वजनाची वाहने सुरु करता येऊ शकतील, असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. चिपळूणमधील सर्व मेडीकल बंद असल्याने चिपळूणवासियांना आवश्यक औषधांसाठी शासकीय मेडीकल सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण व शहरी भाग स्वच्छ करणे, विमा कंपनी व व्यापारी यांच्यात समन्वय साधणे, पंचनामे, पाण्यासाठी जनरेटर आणणे, जेसीपी आणणे, औषध फवारणी आदी विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली.

इतर बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? महाराष्ट्राचं चेरापुंजी कोणत्या गावाला म्हणतात?

महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

घरे जमीनदोस्त, माणसं गाडली, संसार मातीमोल अन् सर्वत्र चिखलांचं साम्राज्य; वाचा, तळीये दुर्घटनेचा आँखो देखा हाल!

(35 dumpers to be ordered to remove mud in Konkan, workers will come from Mumbai, Navi Mumbai : Uday Samant)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.