AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कुठं पडतो? महाराष्ट्राचं चेरापुंजी कोणत्या गावाला म्हणतात?

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. महाबळेश्वर आणि नवजामध्ये सर्वाधिक पावसानं हजेली लावली. महाबळेश्वरमध्ये 48 तासांमध्ये 1 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे.

| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 6:22 PM
Share
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. महाबळेश्वर आणि नवजामध्ये सर्वाधिक पावसानं हजेली लावली. महाबळेश्वरमध्ये 48 तासांमध्ये 1 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. तर, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावाची ओळख आहे. तर, गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंज येथेही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. महाबळेश्वर आणि नवजामध्ये सर्वाधिक पावसानं हजेली लावली. महाबळेश्वरमध्ये 48 तासांमध्ये 1 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे. तर, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या गावाची ओळख आहे. तर, गेल्या काही वर्षांमध्ये पाथरपुंज येथेही मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्याचं समोर आलं आहे.

1 / 6
आंबोली हे गाव महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारं ठिकाण आहे. आंबोली गावाला महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हटलं जातं. आंबोलीत वर्षाला साधारणपणानं  साडे सात हजारांहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद होते. आंबोली हे दक्षिण महाराष्ट्रातील गाव असून तिथून गोवा आणि कर्नाटक राज्य देखील जवळचं आहे.

आंबोली हे गाव महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारं ठिकाण आहे. आंबोली गावाला महाराष्ट्राचं चेरापुंजी देखील म्हटलं जातं. आंबोलीत वर्षाला साधारणपणानं साडे सात हजारांहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद होते. आंबोली हे दक्षिण महाराष्ट्रातील गाव असून तिथून गोवा आणि कर्नाटक राज्य देखील जवळचं आहे.

2 / 6
पाथरपुंज हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे गाव आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे गाव, 2019 मध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी झाली होती. पाथरपुंज गावाचा विस्तार तीन जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती आहे. सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत या गावातील व्यक्तींची घरं आहेत.

पाथरपुंज हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे गाव आहे. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले हे गाव, 2019 मध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी झाली होती. पाथरपुंज गावाचा विस्तार तीन जिल्ह्यांमध्ये असल्याची माहिती आहे. सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत या गावातील व्यक्तींची घरं आहेत.

3 / 6
महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये जवळपास 5 नद्या उगम पावतात. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री नद्या उगम पावतात. या ठिकाणी यंदा जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं तिकडून कोकणात मोठ्या प्रमाणात पाणी गेलं. महाबळेश्वरवरुन येणारे पाणी तिवरे धरणात साठतं होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिवरे धरण दुर्घटना झाली. आता थेट पाणी चिपळूण शहरात पोहोचलं, असं बोललं जाते.

महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये गेल्या 48 तासात 1074.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारपर्यंत महाबळेश्वरमध्ये 142 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये जवळपास 5 नद्या उगम पावतात. कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री नद्या उगम पावतात. या ठिकाणी यंदा जोरदार पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं तिकडून कोकणात मोठ्या प्रमाणात पाणी गेलं. महाबळेश्वरवरुन येणारे पाणी तिवरे धरणात साठतं होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी तिवरे धरण दुर्घटना झाली. आता थेट पाणी चिपळूण शहरात पोहोचलं, असं बोललं जाते.

4 / 6
नवजा: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा येथेही जोरदार पाऊस झाला. नवजाला सातशे मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. त्यामुळे  कोयना धरणातील पाणी साठ्यात विक्रमी वाढ झाली. 24 तासात 18 टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक कोयना धऱणात झाली. नवजा येथून चिपळूणला जाण्यासाठी मार्ग आहे. पण त्यावर देखील दरड कोसळली होती.

नवजा: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील नवजा येथेही जोरदार पाऊस झाला. नवजाला सातशे मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. त्यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात विक्रमी वाढ झाली. 24 तासात 18 टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक कोयना धऱणात झाली. नवजा येथून चिपळूणला जाण्यासाठी मार्ग आहे. पण त्यावर देखील दरड कोसळली होती.

5 / 6
गगनबावडा :कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात होतो. पुराच्या पाण्यानं अनेकदा गगनबावडा तालुक्यात रस्त्यावर पाणी आलेलं पाहायला मिळतं. तर, माथेरनामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होतो.

गगनबावडा :कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण म्हणून गगनबावडा तालुक्याची ओळख आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात होतो. पुराच्या पाण्यानं अनेकदा गगनबावडा तालुक्यात रस्त्यावर पाणी आलेलं पाहायला मिळतं. तर, माथेरनामध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस होतो.

6 / 6
Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.