AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघांमध्ये भांडण झाले, एकाने थंड डोक्याने विचार करून दुसऱ्याला बोलावले आणि असा काढला वचपा

रितेशला फोन करून पानठेल्यावर बोलावून घेतलं. रितेश पानठेल्यात गेला. तेव्हा अनिमेशचा सूर बदलला होता. त्याने थेट काठीने मारहाण करायला सुरुवात केली.

दोघांमध्ये भांडण झाले, एकाने थंड डोक्याने विचार करून दुसऱ्याला बोलावले आणि असा काढला वचपा
| Updated on: May 21, 2023 | 2:02 PM
Share

निलेश डाहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : ही घटना आहे वरोऱ्यातली. रितेश हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. अनिमेश नावाच्या मित्रासोबत दोन दिवसांपूर्वी त्यांचा वाद झाला. ही गोष्टी रितेश विसरून गेला. पण, अनिमेश सूड घेण्याच्या विचारात होता. त्याने थंड डोक्याने विचार केला. रितेशला फोन करून पानठेल्यावर बोलावून घेतलं. रितेश पानठेल्यात गेला. तेव्हा अनिमेशचा सूर बदलला होता. त्याने थेट काठीने मारहाण करायला सुरुवात केली. यात रितेशचा जागीच मृत्यू झाला. दोस्त दुश्मन झाला. कारण काय तर म्हणे क्षुल्लक गोष्टीवरून झालेला वाद.

काठीने मारहाण केली

जिल्ह्यातील वरोरा शहरालगत असलेल्या फुकटनगर या परिसरात एका युवकाची त्याच्याच मित्राने काठीने मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. मृतक रितेश रामचंद्र लोहकरे (वय २० वर्षे) राहणार विकासनगर वरोरा हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता.

VARORA 2 N

रितेशचा जागेवरच मृत्यू

स्वभावाने शांत असल्याने रितेशचे कुणी शत्रूही नव्हते. मात्र आरोपी अनिमेश संजय रेड्डी (वय २२ वर्षे) राहणार विकासनगर याने फोन करून पानठेल्यावर बोलवून घेतले. दोन दिवसांपूर्वीचा राग काढत काठीने मारहाण करून त्याला जागेवर ठार मारले. यानंतर आरोपी पसार झाला.

आरोपीला नागपुरातून ताब्यात घेतले

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि वरोरा पोलिसांनी कसून शोध घेत आरोपीला नागपूरवरून ताब्यात घेतले.

दोन दिवसांपूर्वीच्या भांडणाचा वचपा

दोन दिवसापूर्वी दोघांमध्ये भांडण होऊन आज त्याचा वचपा काढण्यात आला. असे प्रथमदर्शनी कारण पोलीस तपासात समोर आले आहे. नेमके कोणत्या कारणावरून भांडण झाले, हे मात्र कळू शकले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत, असे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी सांगितले.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.