AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये 45 टन सोयाबीनचे बोगस बियाणे, 60 लाखांच्या बियाण्यांसह चाळीस लाखांचा ट्रक जप्त

या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या बनावट बियाण्याच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडालीय.

नांदेडमध्ये 45 टन सोयाबीनचे बोगस बियाणे, 60 लाखांच्या बियाण्यांसह चाळीस लाखांचा ट्रक जप्त
| Updated on: Jun 13, 2023 | 4:05 PM
Share

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये कृषी विभागाच्या सतर्कतेमुळे साठ लाख रुपये किंमतीचे सोयाबीनचे बोगस बियाणे जप्त करण्यात आलंय. तसेच चाळीस लाख रुपये किमतीच्या ट्रकसह हे बियाणे जप्त करण्यात आलंय. नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे सोयाबीनचे बनावट बियाणे तयार करून ते विक्रीसाठी नेले जात होते. गोदावरी सिडस अँड बायोटेक या नावाने हे बनावट बियाणे आढळून आले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करत जवळपास एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या बनावट बियाण्याच्या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडालीय.

बोगस बियाण्याच्या या धंद्यात अनेक बड्या मंडळींचा सहभाग असल्याची माहिती मिळतेय. बोगस बियाणे विक्रीचा कोलंबी गावातील जुनाच धंदा असल्याचे गावकऱ्यानी सांगितलंय. शेतकऱ्यांनी यापूर्वी देखील या कंपनीच्या बनावट बियाण्याची तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांना हाताशी धरून या कंपनीने आपल्यावर कारवाई होऊ दिली नव्हती. मात्र आता थेट तालुका कृषी अधिकाऱ्याने पाळत ठेवत ही कारवाई केल्याने कृषी अधिकाऱ्यांचे कौतुक होतंय.

शेतकऱ्यांना नागवणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

मराठवाडा आणि विदर्भात खरीप हंगामात सोयाबीनचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास सत्तर टक्केच्या आसपास आहे. त्यामुळे बाजारात विक्रीला जाणारे हे बनावट 45 टन सोयाबीन पेरल्या गेले असते तर हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसला असता. सध्या तरी हे बियाणे नेमकं कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होते, याची माहिती मिळू शकली नाही.

मात्र पोलिसांनी कसून तपास केला तर या मागचे सूत्रधार तुरुंगाआड जातील. पण पोलीस तपासावर दबाव असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे गोरगरीब आणि काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असा सवाल विचारल्या जातोय.

सोयाबीन असो की, इतर कोणतेही बियाणे खरेदी करताना सावध राहण्याची वेळ आली आहे. बोगस कंपन्या मोठ्या प्रमाणात तयार झाल्या आहेत. त्यामुळे घरी बियाणे तयार करणे केव्हाही चांगले. फसवणूक झाल्यानंतर ओरडत बसण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.