अहमदनगर : पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवण्यात यश आल्यानंतर शेवटी थकून गेल्यामुळे एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अहमदनगर शहरातील धबधब्यावर हा दुर्दैवी प्रकार घडला. मयूर परदेशी असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघांना जिवदान देणाऱ्या या तरुणाचा दम लागून शेवटी मृत्यू झाल्यामुळे अहमदनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. (After rescuing Three drowning man young boy died in Ahmednagar)
मिळालेल्या माहितीनुसार नगर शहरातील काही युवक धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी हे तिघेही पाण्यात पोहत होते. मात्र, पोहत असताना या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. हे तिघेही धबधब्यात बुडत होते. हा सर्व प्रकार यावेळी मयूर परदेशी या तरुणाने पाहिला. कशाचाही विचार न करता त्याने धबधब्यात उडी घेतली आणी एकएक करुन तिघांनाही पाण्याच्या बाहेर काढले. मात्र, पाण्याच्या प्रवाहातून तिघांनाही बाहेर काढत असताना मयूर परदेशी थकला. शरीरातील त्राण गेल्यामुळे शेवटी धबधब्याच्या काठावर येईपर्यंत परदेशी याला धाप लागली. यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
तिघांना वाचवणारा हा तरुण बुडत असताना त्याला सर्वजण पाहत होते. तरुणाला बुडताना पाहून इतरांनी आरडाओरड केली. त्यानंतर काही युवाकांनी मदतीसाठी धबधब्यात उडीदेखील घेतली. मात्र तोपर्यंत परदेशी पाण्यात बुडाला होता. त्याला पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, स्वत: बलिदान देत तिघांना जीवदान देणाऱ्या या तरुणासोबत घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तिघांना वाचवण्यासाठी त्याने दाखवलेल्या हिमतीचेही अनेकांनी स्वागत केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सध्या शोककळा पसरली आहे.
इतर बातम्या :
Monsoon Alert : पुढचे 5 ते 6 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पावसाचा जोर वाढण्याचा IMDचा अंदाज
Mumbai Rains Live Updates | शहापूरमधील भातसा नदीच्या पाणी पातळीत वाढ
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या छिंदमच्या अडचणी वाढल्या, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर दोषारोपपत्र दाखलhttps://t.co/wrSnC8N9yh#shivajimaharaj |#ShripadChindam |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
(After rescuing Three drowning man young boy died in Ahmednagar)