AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING | ‘अहमदनगरचं नाव आता….’, देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वात मोठी घोषणा केली आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर व्हावं, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. विशेष म्हणजे हिच मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज मान्य केली आहे.

BIG BREAKING | 'अहमदनगरचं नाव आता....', देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा
देवेंद्र फडणवीस
| Updated on: May 31, 2023 | 5:08 PM
Share

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त अहमदनगरच्या चौंडी येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गोपीचंद पडळकर, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे असे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना राम शिंदे यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली. गोपीचंद पडळकर यांनीदेखील याबाबत मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणार, अशी मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील याबाबत घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात अहिल्यानगर नाव होणं हे आमचं भाग्य आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“राजमाता अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी राहिली नसती. त्या नसत्या तर शिवाची मंदिरं आपल्याला दिसली नसती. त्या नसत्या तर दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आमचा धर्म आज जीवंत आहे, तो धर्म आज जीवंत नसता. अशा प्रकारचं कार्य या राजमातेने करुन दाखवलं. त्यामुळे जी मागणी होतेय की, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे, मी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विनंती करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘अहिल्यानगर होणारच’

“आपलं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. आपण छत्रपती शिवरायांचं नाव सांगणारे लोकं आहोत. आपण तुमच्याच नेतृत्वात संभाजीनगर तयार केलंय, आपण धाराशिव तयार केलंय. आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर झालं पाहिजे. मला विश्वास आहे, छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे. तर अहिल्यानगर होणारच. तुमच्या मनात शंका ठेवण्याचं कारण नाहीय”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु झालं. यावेळी त्यांनी अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच, अशी घोषणा केली. त्यामुळे टाळ्यांचा एकच गडगडाट सुरु झाला.

गोपीचंद पडळकर यांच्याकडून आणखी एक मोठी घोषणा

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर गोपीचंद पडळकर यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधत बारामती शासकीय मेडिकल कॉलेजचे नामांतर अहिल्याबाई होळकर मेडिकल कॉलेज बारामती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा जीआर नुकताच काढण्यात आलाय. याचबाबतची माहिती गोपीचंद पडळकर यांनी कार्यक्रमात केली.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.