AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !

कोपरगावहून सात जण खुलताबादला लग्न समारंभासाठी चालले होते. यादरम्यान तळेगाव मळे येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मग लग्नाला पोहचण्याऐवजी वऱ्हाडी रुग्णालयात पोहचले.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !
अहमदनगरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातImage Credit source: TV9
| Updated on: May 04, 2023 | 5:29 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट विहिरीत पडले. यात आठ जण जखमी झाले. भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. कोपरगावहून खुलदाबादकडे हे वाहन जात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगावहून खुलताबादकडे चालली होती जीप

लग्नाचे वराड घेऊन रवंदा कोपरगाव येथून खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावरील गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह गाडीतील इतर 7 जण एकूण आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरी बाहेर काढून उपचारार्थ वैजापूर आणि कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले.

चालकाचे नियंत्रण सुचल्याने अपघात

चालकाला वाहनाचा वेग नियंत्रित न करता आल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहायाने पिकप वाहन आणि वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. सदर विहिरीमध्ये एक जण राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसा करून बघितले असता त्यात काही मिळून आले नाही.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.