AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !

कोपरगावहून सात जण खुलताबादला लग्न समारंभासाठी चालले होते. यादरम्यान तळेगाव मळे येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मग लग्नाला पोहचण्याऐवजी वऱ्हाडी रुग्णालयात पोहचले.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !
अहमदनगरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 04, 2023 | 5:29 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट विहिरीत पडले. यात आठ जण जखमी झाले. भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. कोपरगावहून खुलदाबादकडे हे वाहन जात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगावहून खुलताबादकडे चालली होती जीप

लग्नाचे वराड घेऊन रवंदा कोपरगाव येथून खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावरील गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह गाडीतील इतर 7 जण एकूण आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरी बाहेर काढून उपचारार्थ वैजापूर आणि कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले.

चालकाचे नियंत्रण सुचल्याने अपघात

चालकाला वाहनाचा वेग नियंत्रित न करता आल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहायाने पिकप वाहन आणि वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. सदर विहिरीमध्ये एक जण राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसा करून बघितले असता त्यात काही मिळून आले नाही.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान