AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !

कोपरगावहून सात जण खुलताबादला लग्न समारंभासाठी चालले होते. यादरम्यान तळेगाव मळे येथे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. मग लग्नाला पोहचण्याऐवजी वऱ्हाडी रुग्णालयात पोहचले.

पिकअपमधून लग्नाचं वऱ्हाडं चाललं होतं, अचानक असं काही घडलं की संपूर्ण वऱ्हाडचं वाहनासह विहिरीत कोसळलं !
अहमदनगरमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातImage Credit source: TV9
| Updated on: May 04, 2023 | 5:29 PM
Share

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन चाललेली पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट विहिरीत पडले. यात आठ जण जखमी झाले. भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. कोपरगावहून खुलदाबादकडे हे वाहन जात होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोपरगावहून खुलताबादकडे चालली होती जीप

लग्नाचे वराड घेऊन रवंदा कोपरगाव येथून खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअप जीप महामार्गाच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई-नागपूर महामार्गावरील गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत चालकासह गाडीतील इतर 7 जण एकूण आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरी बाहेर काढून उपचारार्थ वैजापूर आणि कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले.

चालकाचे नियंत्रण सुचल्याने अपघात

चालकाला वाहनाचा वेग नियंत्रित न करता आल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहायाने पिकप वाहन आणि वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले. सदर विहिरीमध्ये एक जण राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसा करून बघितले असता त्यात काही मिळून आले नाही.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.