अकोला: अकोला जिल्हातील बाळापूर तालुक्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसात एका तरुण शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बाळापूर तालुक्यातील सातरगाव शेत शिवारातून घरी परत येत असताना 30 वर्षीय रविंद्रसिंग चव्हाण याच्या अंगावर वीज पडल्यानं त्याचा जागीच मुत्यू झाला आहे.
बाळापूर येथील औरगपुरा भागात राहणारे चतुरसिंग चव्हाण यांना दोन मुले रविंद्रसिंग आणि मुकेशसिंग यांच्यासह एक विवाहीत मुलगी आहे. सातरगांव येथे त्यांची 2 एक्कर बागायती शेती आहे. शेतातील काम संपवून घरी येत असताना मंगळवारी 2 ते 3 च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली ,त्यामुळे रविंद्सिंग ने झाडाखाली सहारा घेतला असता झाडावर वीज झाडावर वीज पडली. यात झाडाखाली उभा असलेला रविंद्सिंग याच्याही अंगावर वीज पडल्याने रवींद्रचा जागीच मृत्यू झाला.
एक महिन्यापूर्वी पुण्यात कार अपघातात रवींद्रसिंग च्या लहाण्या भावाचा मृत्यू झाला होता,आणि आज रवींद्रचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे या बाबत शहरात हळहळ होत आहे.
अकोल्यात मंगळवारी अचानक आलेल्या जोरदार वारा आणि पाऊस व गारपीटमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शहरातील डाबकी रोडवरील नालीचे पाणी रोडवर आल्याने या ठिकाणी तलावाचे स्वरूप आले होते.तर या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मधील व्यापाऱ्यांची तारांमबळ उडाली असून,बाहेर ठेवलेलं धांन्य वाचविण्यासाठी धडपड सुरू होती. तर, जोरदार वाऱ्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानामधील झाड बाहेर रोडवर उभ्या असलेल्या टमटम वर पडल्याने टमटम मातीत अडकलं होतं. अचानक पावसामुळे पुन्हा शेतकरी संकटात सापडला असून, हरभरा,तूर आणि गहू पिकाचे नुकसान होण्याची श्यक्यता आहे.
इतर बातम्या:
sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न
इतर बातम्या:
Akola Farmer Ravindrasingh Chavan died due lightening strike in unseasonal rain