sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न

शेतीमालाला हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ही घोषवाक्य ऐकायला बरी वाटतात. सरकारकडूनही याचा पुन्नउच्चार वारंवार झाला आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. या घोषणा हवेतच विरतात अन् शेतकऱ्यांच्या नशिबातील परिश्रम काही चुकत नाही. पण याच परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिली तर काय क्रांती होऊ शकते हे जिल्ह्यातील सारंगखेडा येथील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.

sugar cane : परिश्रमाला जोड नियोजनाची, सरकारने नाही पण शेतकऱ्याने करुन दाखवले दुप्पट उत्पन्न
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 1:15 PM

नंदूरबार : शेतीमालाला हमीभाव देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु ही घोषवाक्य ऐकायला बरी वाटतात. सरकारकडूनही याचा पुन्नउच्चार वारंवार झाला आहे. पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. या घोषणा हवेतच विरतात अन् (Farmer) शेतकऱ्यांच्या नशिबातील परिश्रम काही चुकत नाही. पण याच परिश्रमाला योग्य नियोजनाची जोड दिली तर काय क्रांती होऊ शकते हे जिल्ह्यातील सारंगखेडा येथील शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. कितीही (Natural Calamities) नैसर्गिक संकटे आलीत तरी नियोजन योग्य असल्यास शेतीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघते हे सिद्ध केलं आहे. (Organic manure) सेंद्रिय खताचा वापर करुन पंकज रावल यांनी ऊसाचे उत्पन्न एकरी 80 ते 85 टन घेतले आहे. शेतीपध्दतीमधील बदल आणि योग्य नियोजन काय असते हे इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे.

10 एकरामध्ये ऊसाची लागवड अन् योग्य नियोजन

पंकज रावल यांनी दहा एकरात सेंद्रिय पद्धतीने ऊसाची शेती करतात याचे उत्तम उदाहण समोर ठेवले आहे. ऊस लागवडीपूर्वी ते शेतात मोठ्या प्रमाणात शेणखत आणि परिसरात मिळत असलेला पालापाचोळा यापासून तयार केलेले गांडूळ खत शेतात विस्कटतात. जेवणात जसे आपण लोणचे, पापड चवीपुरते खातो तसेच रासायनिक खतांचा वापर गरजेपुरता करणे आवश्यक आहे. सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारून उत्पादनात वाढ होते याचा त्यांना प्रत्यय आला आहे. सेंद्रिय खताबरोबरच आवश्यकतेनुसार सिंचनही महत्वाचे आहे.

ऊसाचा दुपटीने उतारा

उत्तर महाराष्ट्रात उसाचा सरासरी एकरी उतारा 40 ते 45 टन येत असतो. वेगवेगळे प्रयोग करुनही 50 टनापेक्षा अधिकेच उत्पादन होत नाही. मात्र, रावल यांनी एकरी 80 ते 85 टन उत्पन्न घेत आहेत. केवळ परिश्रमच नाही त्याला तर योग्य नियोजनाची जोड दिली तरच हे शक्य असल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळेच सेंद्रिय खताचा वापर करून आपल्या जमिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादन डबल घ्यावे असे आवाहन त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही केले आहे.

4 लाख खर्च अन् 8 लाखाचे उत्पादन

गेल्या अनेक दिवसांपासून रावल हे ऊसाचे उत्पादन घेत आहेत. आता त्यांनी लागवड क्षेत्रात आणि जोपासण्याच्या पध्दतीमध्येही बदल केला आहे. 10 एकर उसाच्या लागवडीपासून तोडणीपर्यंत त्यांना चार लाख रुपये खर्च आला आहे. तर दुसरीकडे उत्पादनाच्या विचार केला असता त्यांना 10 एकरात 8 लाख रुपयांचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे रासायनिक खतांवर जास्त खर्च न करता त्यांनी योग्य नियोजन केल्याने त्यांचा खर्चात बचत होऊन नफा वाढला आहे.

संबंधित बातम्या :

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी

खरिपातील दोन पिकांच्या विम्याचे झाले काय ? शेतकऱ्यांना तर एक छदामही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.