AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका

अनियमित पावसामुळे यंदाचा खरीप हंगामच पाण्यात गेला आहे. सुरवातीला मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका बसला होता तर त्यानंतर सुरु झालेली अवकाळी आता रब्बीचा पेरा झाला तरी कायम आहे. खरिपातील तूर आणि कापूस ही दोनच पिके वावरात आहे. आता अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे.

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 10:17 AM
Share

नांदेड : (Untimely rain) अनियमित पावसामुळे यंदाचा खरीप हंगामच पाण्यात गेला आहे. सुरवातीला मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका बसला होता तर त्यानंतर सुरु झालेली अवकाळी आता (Rabbi Sowing) रब्बीचा पेरा झाला तरी कायम आहे. खरिपातील तूर आणि कापूस ही दोनच पिके वावरात आहे. आता अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. (Marathwada) मराठवाड्यात तुरीची काढणी सुरु असतानाच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे तर कापसाची बोंडे भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिसाकावून घेतलेला आहे. खरीप हंगामापासून सुरु झालेले संकट कायम असल्याने आता उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे.

पावसाने तुरीच्या पिकाचे नुकसान

खरीप हंगामात आंतरपिक म्हणून तुरीचे उत्पादन घेतले जाते. सुरवातीच्या अतिवृष्टीमध्ये हे पीक बहरात होते म्हणून पावसाचा परिणाम झााल नाही. पण मध्यंतरीच्या अवकाळी पावसापासून या पिकावरही दुष्ट्यचक्र सुरु झाले आहे. अवकाळीनंतर वातारणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेंगा पोसल्याच नाही. आता ऐन काढणीच्या दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे तर काढणी झालेल्या तुरीच्या शेंगाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे खरिपातील एकाही पिकाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही.

कापसाच्या दरात वाढ मात्र, साठवणूक केलेला कापूसही भिजला

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नसल्याने मध्यंतरी कापसाच्या दरात घट झाली होती. 9 हजार रुपये क्विंटलचे दर थेट 7 हजारावर येऊन ठेपले होते. दरवाढीच्या प्रतिक्षेत शेतकऱ्यांनी कापसाच्या साठवणूकीवर भर दिला होता. त्यानंतर कुठे गेल्या दोन दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरवात झाली आहे. नंदुरबार बाजारसमितीमध्ये विक्रमी 9 हजार रुपये दर मिळाला आहे. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे साठवणूक केलेला कापूसही भिजला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कितीही नियोजन केले तरी यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका हा खरीप हंगामातील पिकांना बसलेला आहे.

आता ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा प्रादुर्भाव

अककाळी पावसाचा परिणाम केवळ खरीप हंगामातील पिकांवरच झालेला नाही तर रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान झाले आहे. शिवाय सबंध राज्यात आता ढगाळ वातारवणामुळे रब्बी हंगामातील फुलोऱ्यात आलेल्या हरभरा पिकावर घाटीअळीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता 5 टक्के निंबोळी अर्क, एकरी 2 कामगंध सापळे व 20 पक्षा थांबे बसवावे लागणार आहेत. शिवाय अळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के 4 ग्रॅम क्विनॅालफास हे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या :

खरेदी केंद्रावरच तुरीचा बाजार अवलंबून, नववर्षात लागणार खरेदीला मुहूर्त

आता बाराही महिने हिरवा चारा, जनावरांसाठी पोषक अन् शेतकऱ्यांसाठी सोपी प्रक्रिया

निसर्गाचे दुष्टचक्र कायम : अवकाळीने फळबागांचे तर गारपिटीनं रब्बी हंगामाचे नुकसान

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.