AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी

अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर शेतामध्ये दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे.

अवकाळी पाऊस बेतला जीवावर, वीज कोसळल्याने 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, रब्बीतील पिकेही आडवी
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 11:50 AM
Share

भंडारा : अवकाळी पावसामुळे केवळ रब्बी- खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. (Bhandara district) जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धुसडा नवेगाव शिवारात आजोबांसोबत म्हैशी राखण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय नातवाचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे. तर शेतामध्ये दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे (Untimely rain) अवकाळी पावसाने केवळ रब्बी आणि खरिपातील पिकांचेच नुकसान झाले नाही तर मनुष्यहानीही झाली आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस आणि गापपिटीने थैमान घातले होते. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे.

आजोबांसोबत गेला होता नयन

जनावरे चारण्यासाठी नयनचे आजोबा रोज शिवारातील पडीक क्षेत्रावर जात होते. मंगळवारी त्यांच्यासोबत नातू नयनही गेला होता. म्हैस चारत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला व वीज नयनच्या अंगावर कोसळली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे गोठ्यातील दावणीला बांधलेल्या बैलही दगावला आहे. त्यामुळे पुंडे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुर्देवी घटने 9 वर्षाच्या नयनला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात होती.

रब्बी पिकांचे अन् भाजीपाल्याचेही नुकसानच

रब्बीचा पेरा होऊन 15 दिवसांचाच कालावधी लोटलेला होता. पिकांची उगवण होताच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे सर्व भाजीपालाही पाण्यात आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्वरीत नुकसानभरपाई देण्याचा मागणी आता शेतकरी करीत आहेत. मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती कामे तर खोळंबलेली आहेतच पण शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीसाठी केलेला खर्च आणि आता खरिपातील पिकांचे होणारे उत्पादन असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे.

भंडारा जिल्ह्यातील या भागात झाला अवकाळी पाऊस

भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान खात्याने दिलेला अंदाज़ खरा ठरला असून काल भंडारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. तुमसर व मोहाड़ी तालुक्यात अनेक ग्रामीण भागात काल गारपीठ झाली असून ह्या गारपीठीने रब्बी पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. मोहाडी तालुक्यात उसरी, लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कान्द्री तर तुमसर तालुक्यातिल पवनार व अनेक ग्रामीण भागात गारपीठ झाली आहे।ह्यात शेतकऱ्यांचे रब्बी पिकासह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे।ह्या नुकसानी चे पंचनामे करून नुक्सान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.

संबंधित बातम्या :

खरिपातील दोन पिकांच्या विम्याचे झाले काय ? शेतकऱ्यांना तर एक छदामही नाही, अधिकाऱ्यांचेही तोंडावर बोट

नुकसानीची अवकाळी : खरिपाची उरली-सुरली आशाही मावळली, रब्बी पिकांनाही वातावरणाचा धोका

आता बाराही महिने हिरवा चारा, जनावरांसाठी पोषक अन् शेतकऱ्यांसाठी सोपी प्रक्रिया

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.