AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा ‘त्या’ शेंबड्याचे नाव घेऊ नका”; नामाकरणावरून विरोधकांना भाजप आमदाराने उडवून लावलं

माझे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना त्याबाबत सूचना केल्या आणि त्यानंतर गिरीश महाजन यांचा मला लगेच फोन आला आणि आपली त्यांनी मागणी मान्य केली.

आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा 'त्या' शेंबड्याचे नाव घेऊ नका; नामाकरणावरून विरोधकांना भाजप आमदाराने उडवून लावलं
| Updated on: May 31, 2023 | 8:59 PM
Share

अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यापासून औरंगाबाद आणि आता अहमदनगर शहरांचे नामाकरण करण्यात आले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. आज अहमदनगरचे नामाकरण अहिल्यादेवीनगर केल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनतेच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.तर त्यांनी त्याचवेळी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे. अहमदनगरचे नामाकरण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी बोचरी टीका आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिवशीच अहमदनगरचे नामाकरण केल्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा आहे, त्यामुळे त्या शेंबड्याचे नाव घेऊ नका असे म्हणत त्यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, आजचा हा दिवस आयुष्यातील सर्वात आनंदाची घटना आहे. त्याच बरोबर आमच्या आईसाहेब अहिल्यादेवी यांचे नाव देण्यात येत आहे त्यामुळे ही आमच्यासाठी अभिमानाची घटना असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून आम्ही अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आजच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अत्यंत जलदगतीने या नावाची त्यांनी घोषणा केली आहे.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की, आज अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे.

त्यांनी ही मागणी मान्य केल्यामुळेच महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने मी त्यांचे विशेष अभिनंदन करत असल्याचे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

यावेळी ते म्हणाले की, दुसरे अभिनंदन यासाठी करतो की, बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयालाही अहिल्यादेवी होळकरांचे नाव देण्याची लाईव्ह मागणी केली होती.

त्यामुळे माझे भाषण सुरू असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना त्याबाबत सूचना केल्या आणि त्यानंतर गिरीश महाजन यांचा मला लगेच फोन आला आणि आपली त्यांनी मागणी मान्य केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी त्या शेंबड्याचे नावही आज घेऊ नका असा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.