AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात”; भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर…

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना राम शिंदे यांनी म्हटले आहे की, भाजप पक्षाने त्यांना आमदार, खासदार, मंत्री, महसूल मंत्री केलं मग त्यांना अजून काय पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात, त्या पक्षाच्या विरोधात काम करतात;  भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर...
| Updated on: May 16, 2023 | 7:46 PM
Share

अहमदनगर : बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात एकमेकांविरोधात असणारे राजकीय पक्ष बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र गळ्यात गळे घालून निवडणूक लढत आहेत. मात्र आता पक्षा-पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. त्यामुळे आता राज्यातील राजकारणातील युती-आघाडीविषयी आता नेमकं काय होणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्याच्या राजकारणात अहमदनगरमधील बाजार समितीची निवडणुकीचीही जोरदार चर्चा सुरु आहे.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळी खेळी खेळल्याचा आरोप केला गेल्याने आता नगर जिल्ह्यातील शिंदे आणि विखे पाटील वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

अहमदनगर बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने त्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

आमदार राम शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्याने हा वाद आणखी उफाळून येणार असल्याचे दिसून येत आहे.

भाजपमुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे चिरंजीव आमदार, खासदार आणि विखे पाटील मंत्री झाल्याचे सांग त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

विखे पाटील पिता पुत्रांवर गंभीर आरोप केले गेल्याने त्यावर आता विखे पाटील त्यावर काय प्रतिक्रिया देणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सभापती निवडीवरून विखेंनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. राम शिंदे यांनी त्यांच्या आमदाराकी पासून ते अगदी त्यांच्या मंत्रीपदापर्यंत उल्लेख करून त्यांना हे फक्त भाजपमुळे मिळाले आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. तरीही त्यांनी बाजार समितीच्या राजकारणात भाजपविरोधी राजकारण केल्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

तसेच विखे कुटुंबीय ज्या पक्षात जातात त्या पक्षाच्या विरोधात ते काम करत असतात असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना राम शिंदे यांनी म्हटले आहे की, भाजप पक्षाने त्यांना आमदार, खासदार, मंत्री, महसूल मंत्री केलं मग त्यांना अजून काय पाहिजे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आता सभापती निवडीबाबत पक्षाच्या विरोधात काम केल्याने पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचेही राम शिंदे यांनी म्हटले आहे.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.