AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अमरावतीला जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न”; म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी बेरोजगारांसाठी थेट जॉब महोत्सवाचेच आयोजन

यशोमती ठाकूर यांच्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या भागातील युवकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमरावतीला जातीय-धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न; म्हणून काँग्रेसच्या आमदारांनी बेरोजगारांसाठी थेट जॉब महोत्सवाचेच आयोजन
| Updated on: May 16, 2023 | 6:08 PM
Share

अमरावती : राज्यातील राजकारण शिवसेना आणि ठाकरे गटातील हेवदावे आणि आरोप प्रत्यारोप यांच्यामुळे ढवळून निघाले असतानच अमरावती शहरामध्ये मात्र वेगळं चित्र दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांकडून वारंवार केंद्र सरकारवर लोकांचे मूलभूत प्रश्न जैसे थे ठेवून जातीय राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची काँग्रेसकडून केली जात आहे. त्यावरून आता अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना आमदारर यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहरात जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी जॉब महोत्सव आयोजित करण्यात आला असून यानिमित्ताने त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जातीय राजकारणावरून हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात टीका करताना त्यांनी आपल्या ट्विटमधये म्हटले आहे की, अमरावतीला गेल्या काही वर्षांपासून जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाची प्रयोगशाळा करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून चालवला जात आहे.

एकीकडे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाची प्र्योगशाळा बनवण्याचे काम येथे चालत आहे तर दुसरीकडे यशोमती ठाकूर यांनी जनतेचे मुलभूत प्रश्नांवर सवाल उपस्थित करुन सरकारवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या राज्यातील युवकांचे प्रश्न वेगळे आहेत.

तर रोटी-कपडा-मकान-रोजगार आणि शेती-मातीचे प्रश्न गंभीर असल्याचा घणाघातही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. केंद्रात आणि राज्यात असलेले सरकार लोकांच्या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक सोडवणूक केल्याने आता आम्ही त्यांच्या हाताला काम देण्याचे ठरविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून अमरावतीत आम्ही जॉब महोत्सव भरवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यशोमती ठाकूर यांच्यामुळे आता अमरावती जिल्ह्यातील अनेक युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या भागातील युवकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होणर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.