AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका सीनसाठी 433 कोंबड्या आणि 45 बोकड कापले, हा चित्रपट बनवण्यासाठी लागली 18 वर्षे, प्रदर्शित होताच…

बॉलिवूडमधील हा चित्रपट बनवण्यासाठी लागले होते 18 वर्षे. एका सीनसाठी 433 कोंबड्या आणि 45 बोकड कापले.

एका सीनसाठी 433 कोंबड्या आणि 45 बोकड कापले, हा चित्रपट बनवण्यासाठी लागली 18 वर्षे, प्रदर्शित होताच...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 15, 2026 | 3:37 PM
Share

Kamal Amrohi : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट निर्माण झाले पण कमाल अमरोही दिग्दर्शित पाकीज़ा या चित्रपटाची सर आजही कोणी गाठू शकलेले नाही. या चित्रपटाला अमरोही यांच्या दिग्दर्शनाचा आणि मीना कुमारी यांच्या अप्रतिम अभिनयाचा लाभ मिळाला. कमाल अमरोही यांनी आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ चार चित्रपट दिग्दर्शित केले पण प्रत्येक चित्रपटाने अमिट छाप सोडली.

‘पाकीज़ा’ हा चित्रपट कमाल अमरोहींसाठी केवळ एक चित्रपट नव्हता तर तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. या चित्रपटाची शूटिंग 1956 साली सुरू झाली आणि तब्बल 18 वर्षांनंतर 1972 मध्ये तो प्रदर्शित झाला. या काळात अनेक गोष्टी बदलल्या, नातेसंबंध बदलले पण अमरोहींची जिद्द मात्र कायम राहिली.

त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येक सीनमध्ये बारीकसारीक गोष्टींवर विशेष लक्ष दिले जात होते. भव्य सेट्स, पोशाख, प्रभावी संवाद आणि उर्दू शायरी या सगळ्यांमध्ये त्यांनी परिपूर्णतेचा ध्यास घेतला. परिणामी चित्रपट पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली.

मीना कुमारींची भावनिक लढाई

चित्रपटातील ‘साहिबजान’ची भूमिका साकारण्यासाठी कोणतीही अभिनेत्री निवडता आली असती, मात्र कमाल अमरोहींच्या मते ही भूमिका फक्त मीना कुमारीच करू शकत होत्या. त्या काळात दोघांचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण होते. घटस्फोटानंतरही त्यांनी या चित्रपटासाठी एकत्र काम केले.

चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यात मीना कुमारी गंभीर आजाराने त्रस्त होत्या. लिव्हरच्या आजाराने, मद्याच्या व्यसनाने आणि तुटलेल्या नात्यांनी त्यांना आतून खचवले होते. तरीही असह्य वेदनांमध्ये त्यांनी अनेक सीन पूर्ण केले. 1972 मध्ये ‘पाकीज़ा’ प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण काही आठवड्यांतच तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला.

शाही थाट आणि कठोर स्वभाव

कमाल अमरोही यांचा परफेक्शनचा अट्टहास इतका होता की सेटवर शाही वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी शेकडो कोंबड्या आणि बोकड कापल्याची चर्चा आहे. त्यांचा स्वभाव तापट असल्याचेही म्हटले जाते. सेटवर ते कलाकारांना रागावायचे. एका प्रसंगी राज्यपालांसमोर त्यांना ‘मीना कुमारींचे पती’ असे संबोधल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्या काळात VFX किंवा कृत्रिम प्रभावांची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रत्येक सीन योग्य दिसावा यासाठी अमरोही कोणतीही तडजोड करत नसत. वास्तववादी परिणाम साधण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाण्यास तयार होते.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.