AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका सीनसाठी 433 कोंबड्या आणि 45 बोकड कापले, हा चित्रपट बनवण्यासाठी लागली 18 वर्षे, प्रदर्शित होताच…

बॉलिवूडमधील हा चित्रपट बनवण्यासाठी लागले होते 18 वर्षे. एका सीनसाठी 433 कोंबड्या आणि 45 बोकड कापले.

एका सीनसाठी 433 कोंबड्या आणि 45 बोकड कापले, हा चित्रपट बनवण्यासाठी लागली 18 वर्षे, प्रदर्शित होताच...
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 15, 2026 | 3:37 PM
Share

Kamal Amrohi : हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट निर्माण झाले पण कमाल अमरोही दिग्दर्शित पाकीज़ा या चित्रपटाची सर आजही कोणी गाठू शकलेले नाही. या चित्रपटाला अमरोही यांच्या दिग्दर्शनाचा आणि मीना कुमारी यांच्या अप्रतिम अभिनयाचा लाभ मिळाला. कमाल अमरोही यांनी आपल्या 45 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ चार चित्रपट दिग्दर्शित केले पण प्रत्येक चित्रपटाने अमिट छाप सोडली.

‘पाकीज़ा’ हा चित्रपट कमाल अमरोहींसाठी केवळ एक चित्रपट नव्हता तर तो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. या चित्रपटाची शूटिंग 1956 साली सुरू झाली आणि तब्बल 18 वर्षांनंतर 1972 मध्ये तो प्रदर्शित झाला. या काळात अनेक गोष्टी बदलल्या, नातेसंबंध बदलले पण अमरोहींची जिद्द मात्र कायम राहिली.

त्यांच्या स्वभावामुळे प्रत्येक सीनमध्ये बारीकसारीक गोष्टींवर विशेष लक्ष दिले जात होते. भव्य सेट्स, पोशाख, प्रभावी संवाद आणि उर्दू शायरी या सगळ्यांमध्ये त्यांनी परिपूर्णतेचा ध्यास घेतला. परिणामी चित्रपट पूर्ण होण्यास अनेक वर्षे लागली.

मीना कुमारींची भावनिक लढाई

चित्रपटातील ‘साहिबजान’ची भूमिका साकारण्यासाठी कोणतीही अभिनेत्री निवडता आली असती, मात्र कमाल अमरोहींच्या मते ही भूमिका फक्त मीना कुमारीच करू शकत होत्या. त्या काळात दोघांचे वैवाहिक आयुष्य तणावपूर्ण होते. घटस्फोटानंतरही त्यांनी या चित्रपटासाठी एकत्र काम केले.

चित्रपटाच्या अखेरच्या टप्प्यात मीना कुमारी गंभीर आजाराने त्रस्त होत्या. लिव्हरच्या आजाराने, मद्याच्या व्यसनाने आणि तुटलेल्या नात्यांनी त्यांना आतून खचवले होते. तरीही असह्य वेदनांमध्ये त्यांनी अनेक सीन पूर्ण केले. 1972 मध्ये ‘पाकीज़ा’ प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीला तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही पण काही आठवड्यांतच तो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला.

शाही थाट आणि कठोर स्वभाव

कमाल अमरोही यांचा परफेक्शनचा अट्टहास इतका होता की सेटवर शाही वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी शेकडो कोंबड्या आणि बोकड कापल्याची चर्चा आहे. त्यांचा स्वभाव तापट असल्याचेही म्हटले जाते. सेटवर ते कलाकारांना रागावायचे. एका प्रसंगी राज्यपालांसमोर त्यांना ‘मीना कुमारींचे पती’ असे संबोधल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्या काळात VFX किंवा कृत्रिम प्रभावांची सुविधा नव्हती. त्यामुळे प्रत्येक सीन योग्य दिसावा यासाठी अमरोही कोणतीही तडजोड करत नसत. वास्तववादी परिणाम साधण्यासाठी ते कोणत्याही टोकाला जाण्यास तयार होते.

माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.