AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर ‘हे’ काम करू नका, अन्यथा सुरू होईल वाईट काळ

शिवमंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर आणि रुद्राभिषेक केल्यानंतर घरी परतल्यावर काही गोष्टी करणे टाळावे. अन्यथा पूजा निष्फळ ठरू शकते. चला तर मग शिवलिंगावर जल अर्पण केल्यावर कोणती कामे करू नये त्याबद्दल जाणून घेऊयात.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर 'हे' काम करू नका, अन्यथा सुरू होईल वाईट काळ
| Updated on: Feb 15, 2026 | 4:00 PM
Share

दरवर्षी महाशिवरात्रीचा पवित्र सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. हा सण उद्या 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. शिव आणि शक्तीच्या मिलनाचे स्मरण करण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भाविक भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाची विशेष पूजा करतात. शिवभक्तांसाठी हा सण खूप महत्वाचा असतो कारण या दिवशी शिवलिंगावर विविध अभिषेक करून पुजा पाठ स्तोत्र पठण केले जातात.

या दिवशी भाविक निर्जला उपवास करतात आणि कडक विधी करतात. शिवलिंगावर रुद्राभिषेकम देखील केले जाते. तथापि मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर आणि रुद्राभिषेकम केल्यानंतर, घरी परतल्यावर काही गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत. अन्यथा एखाद्या व्यक्तीला पापाचा दोष लागू शकतो आणि पूजा निष्फळ होऊ शकते. तर घरी परतल्यावर आणि शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर कोणती गोष्ट करणे टाळावी हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यानंतर आणि मंदिरातून परतल्यानंतर या गोष्टी करू नका

शिवमंदिरात पाणी अर्पण केल्यानंतर कधीही रिकाम्या हाताने घरी परतू नका. तुम्ही जर शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी एखादा तांब्या सोबत आणला असेल तर घरी परतण्यापूर्वी त्यात पाणी, चरणामृत, फळे, फुले किंवा इतर नैवेद्य ठेवा. असे न केल्यास पाप लागू शकते.

शिवमंदिरात पाणी अर्पण केल्यानंतर घरी परतताना किंवा वाटेत कुठेही हात किंवा पाय लगेच धुणे टाळा. असे केल्याने तुम्हाला नकारात्मक उर्जेच्या परिणामाला समोरे जावे लागू शकते.

घरी परतल्यावर मंदिरातून आणलेला प्रसाद लगेच खाऊ नका. किंवा वाटेत तो खाऊ नका. असे करणे शास्त्रात अशुभ मानले जाते. शिवाय प्रसाद अशुद्ध ठिकाणी ठेवू नका किंवा त्याचा अपमान करू नका.

मंदिरातून बाहेर पडताच चिडणे किंवा भांडणे टाळा. तसेच, नकारात्मक विचारांपासून दूर रहा.

मंदिरातून परतल्यानंतर लगेच झोपू नका. यामुळे कारण तुम्ही मंदिरातून पुजा करून आल्यानंतर तुमच्यासोबत असलेली सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि अडचणींवर मात करण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान
काळजी फक्त रोहित पवारांनाच आहे असं नाही; प्रवीण दरेकरांचं मोठं विधान.
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन
हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाविरोधात राज्यभरात आंदोलन.