AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर ‘हे’ काम करू नका, अन्यथा सुरू होईल वाईट काळ

शिवमंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर आणि रुद्राभिषेक केल्यानंतर घरी परतल्यावर काही गोष्टी करणे टाळावे. अन्यथा पूजा निष्फळ ठरू शकते. चला तर मग शिवलिंगावर जल अर्पण केल्यावर कोणती कामे करू नये त्याबद्दल जाणून घेऊयात.

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर पाणी अर्पण केल्यानंतर 'हे' काम करू नका, अन्यथा सुरू होईल वाईट काळ
| Edited By: | Updated on: Feb 27, 2026 | 11:16 AM
Share

दरवर्षी महाशिवरात्रीचा पवित्र सण फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. हा सण उद्या 15 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. शिव आणि शक्तीच्या मिलनाचे स्मरण करण्यासाठी महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भाविक भक्त उपवास करतात आणि भगवान शिवाची विशेष पूजा करतात. शिवभक्तांसाठी हा सण खूप महत्वाचा असतो कारण या दिवशी शिवलिंगावर विविध अभिषेक करून पुजा पाठ स्तोत्र पठण केले जातात.

या दिवशी भाविक निर्जला उपवास करतात आणि कडक विधी करतात. शिवलिंगावर रुद्राभिषेकम देखील केले जाते. तथापि मंदिरात शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर आणि रुद्राभिषेकम केल्यानंतर, घरी परतल्यावर काही गोष्टी करणे टाळल्या पाहिजेत. अन्यथा एखाद्या व्यक्तीला पापाचा दोष लागू शकतो आणि पूजा निष्फळ होऊ शकते. तर घरी परतल्यावर आणि शिवलिंगावर जल अर्पण केल्यानंतर कोणती गोष्ट करणे टाळावी हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

शिवलिंगाला पाणी अर्पण केल्यानंतर आणि मंदिरातून परतल्यानंतर या गोष्टी करू नका

शिवमंदिरात पाणी अर्पण केल्यानंतर कधीही रिकाम्या हाताने घरी परतू नका. तुम्ही जर शिवलिंगाला पाणी अर्पण करण्यासाठी एखादा तांब्या सोबत आणला असेल तर घरी परतण्यापूर्वी त्यात पाणी, चरणामृत, फळे, फुले किंवा इतर नैवेद्य ठेवा. असे न केल्यास पाप लागू शकते.

शिवमंदिरात पाणी अर्पण केल्यानंतर घरी परतताना किंवा वाटेत कुठेही हात किंवा पाय लगेच धुणे टाळा. असे केल्याने तुम्हाला नकारात्मक उर्जेच्या परिणामाला समोरे जावे लागू शकते.

घरी परतल्यावर मंदिरातून आणलेला प्रसाद लगेच खाऊ नका. किंवा वाटेत तो खाऊ नका. असे करणे शास्त्रात अशुभ मानले जाते. शिवाय प्रसाद अशुद्ध ठिकाणी ठेवू नका किंवा त्याचा अपमान करू नका.

मंदिरातून बाहेर पडताच चिडणे किंवा भांडणे टाळा. तसेच, नकारात्मक विचारांपासून दूर रहा.

मंदिरातून परतल्यानंतर लगेच झोपू नका. यामुळे कारण तुम्ही मंदिरातून पुजा करून आल्यानंतर तुमच्यासोबत असलेली सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि अडचणींवर मात करण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.