रायगड/ मेहबूब जमादार : माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार व शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर रायगड जिल्ह्यातील आघाडीत बिघाडी झाल्याचे वातावरण निर्माण झाले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी तातडीने रायगडमध्ये येऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. यावेळी सेना पदाधिकाऱ्यांकडून तटकरेंच्या तक्रारींचा पाढा वाचण्यात आला तर दुसरीकडे खासदार तटकरे यांनी देखील राजकीय उत्तर द्यायला राष्ट्रवादी समर्थ असल्याचे सांगितल्याने आज अलिबागमध्ये होणाऱ्या जिल्हा नियोजन बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (Both the MPs rushed to settle the dispute between Shiv Sena and NCP in Raigad)
या बैठकीत जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी जाहीरपणे पालकमंत्री निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केल्याने तणाव निर्माण झाला. मात्र शिवसेनेच्याच आजी माजी आमदारांनी नवगणे यांना गप्प केले. यानंतर खासदार सुनील तटकरे आणि सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदरांची एक गुप्त बैठक तब्बल दोन तास सुरू होती. यामध्ये शिवसेनेचे कर्जत येथील आमदार महेंद्र थोरवे हे आक्रमक भूमिकेत होते. त्यांना समजावण्यात दोन तास निघून गेले. बैठकीनंतर मात्र सर्वजण आघाडीचा धर्म पाळणार असल्याची सारवा सारव करण्यात आली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते (Anant Geete) यांनी रायगडमध्ये केले होते. श्रीवर्धन तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केले होते. कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सभांळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सभांळायची आहे. उद्या आघाडी तुटलीच तर आपण तटकरेकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही. माजी केद्रिंय मंत्री अनंत गिते यांनी श्रीवर्धनमध्ये पक्ष प्रवेश सोहळ्या दरम्यान आघाडी सरकारवर घाणागाती टिका करुन येत्या ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळाचा नारा दिला आहे. (Both the MPs rushed to settle the dispute between Shiv Sena and NCP in Raigad)
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच ‘सुधारणे’ची जबाबदारी, वाचा नेमकं काय?https://t.co/UV0Bz5MBWh#AjitPawar |#Responsibility |#ModiGovernment |#Improve
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2021
इतर बातम्या
जळगाव जिल्हा बँक निवडणूक; एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत होणार?