AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Rain | पहिल्याच पावसात चिखली नगर परिषद नापास, शहरातील अनेक दुकानांत शिरले पाणी, दुकानदारांचे आर्थिक नुकसान

पहिल्याच पावसात चिखली नगर परिषदेचे पितळ उघडं पडलं. आता दुकानात शिरलेलं पाणी मोटार लावून काहींनी बाहेर काढलं. नगर परिषदही स्वच्छतेच्या कामाला लागली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ उपसायला सुरुवात झाली आहे. आधीच नाल्यांमधील गाळ काढला असता तर कदाचित नगर परिषदेवर आता स्वच्छता करण्याची वेळ आली नसती.

Buldana Rain | पहिल्याच पावसात चिखली नगर परिषद नापास, शहरातील अनेक दुकानांत शिरले पाणी, दुकानदारांचे आर्थिक नुकसान
पहिल्याच पावसात चिखली नगर परिषद नापास
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 19, 2022 | 11:23 AM
Share

बुलडाणा : जिल्ह्यासह चिखली (Chikhali) तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील नाल्यांमधून पाणी वाहायला लागले. मात्र विकासकामांच्या बाबतीत निर्लज्ज असलेल्या चिखली नगर परिषदेने (Municipal Council) शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व साफसफाई केली नाही. त्यामुळं पावसाच्या पाण्याने नाल्या ब्लॉक झाल्या. त्यामुळं नालीतील पाणी रस्त्यावर आले. काही ठिकाणी नालीतील पाणी थेट अंडर ग्राउंड असलेल्या दुकानात घुसले. यामुळे दुकान घाण पाण्याने भरलेत. दुकानातील साहित्य भिजले. नगर परिषदेच्या चुकीच्या कारभारामुळे याचा फटका दुकानदार लोकांना बसला. त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. नुकसान झालेल्या दुकानदारांनी (Shopkeeper) नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला अनेकवेळा सांगितले. तरीही नगर परिषदेनं नाल्यांची स्वच्छ्ता केली नाही. त्याचा परिणाम काल समोर आला. आता यामुळे रोगराई सुद्धा पसरण्याची शक्यता आहे.

पावसानंतर चिखली नगर परिषदेला आली जाग

पहिल्याच पावसात चिखली नगर परिषदेचे पितळ उघडं पडलं. आता दुकानात शिरलेलं पाणी मोटार लावून काहींनी बाहेर काढलं. नगर परिषदही स्वच्छतेच्या कामाला लागली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ उपसायला सुरुवात झाली आहे. आधीच नाल्यांमधील गाळ काढला असता तर कदाचित नगर परिषदेवर आता स्वच्छता करण्याची वेळ आली नसती. दुकानदारांचं नुकसान झाल्यानंतर नगर परिषद कामाला लागली आहे. त्यांनी कर्मचारी लावून नाल्यांच्या सफाईचं काम सुरू केलं आहे.

नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून 3 ठिकाणी 3 मृत्यू

नागपुरात समाधानकारक अशा पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी तयारी करा, अशा एकप्रकारे सूचना पावसाने दिल्या. मात्र काल नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह पाऊस झालां. त्यामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. एका बैलजोडीचा सुद्धा मृत्यू झाला. पाऊस आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शहराचा विचार केला तर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांसाठी वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मान्सून थोडा लेट जरी आला असला तरी सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पेरणीनं वेग घेतला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.