AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldana Rain | पहिल्याच पावसात चिखली नगर परिषद नापास, शहरातील अनेक दुकानांत शिरले पाणी, दुकानदारांचे आर्थिक नुकसान

पहिल्याच पावसात चिखली नगर परिषदेचे पितळ उघडं पडलं. आता दुकानात शिरलेलं पाणी मोटार लावून काहींनी बाहेर काढलं. नगर परिषदही स्वच्छतेच्या कामाला लागली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ उपसायला सुरुवात झाली आहे. आधीच नाल्यांमधील गाळ काढला असता तर कदाचित नगर परिषदेवर आता स्वच्छता करण्याची वेळ आली नसती.

Buldana Rain | पहिल्याच पावसात चिखली नगर परिषद नापास, शहरातील अनेक दुकानांत शिरले पाणी, दुकानदारांचे आर्थिक नुकसान
पहिल्याच पावसात चिखली नगर परिषद नापास
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Jun 19, 2022 | 11:23 AM
Share

बुलडाणा : जिल्ह्यासह चिखली (Chikhali) तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातील नाल्यांमधून पाणी वाहायला लागले. मात्र विकासकामांच्या बाबतीत निर्लज्ज असलेल्या चिखली नगर परिषदेने (Municipal Council) शहरातील नाल्यांची मान्सून पूर्व साफसफाई केली नाही. त्यामुळं पावसाच्या पाण्याने नाल्या ब्लॉक झाल्या. त्यामुळं नालीतील पाणी रस्त्यावर आले. काही ठिकाणी नालीतील पाणी थेट अंडर ग्राउंड असलेल्या दुकानात घुसले. यामुळे दुकान घाण पाण्याने भरलेत. दुकानातील साहित्य भिजले. नगर परिषदेच्या चुकीच्या कारभारामुळे याचा फटका दुकानदार लोकांना बसला. त्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. नुकसान झालेल्या दुकानदारांनी (Shopkeeper) नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला अनेकवेळा सांगितले. तरीही नगर परिषदेनं नाल्यांची स्वच्छ्ता केली नाही. त्याचा परिणाम काल समोर आला. आता यामुळे रोगराई सुद्धा पसरण्याची शक्यता आहे.

पावसानंतर चिखली नगर परिषदेला आली जाग

पहिल्याच पावसात चिखली नगर परिषदेचे पितळ उघडं पडलं. आता दुकानात शिरलेलं पाणी मोटार लावून काहींनी बाहेर काढलं. नगर परिषदही स्वच्छतेच्या कामाला लागली. नाल्यांमध्ये साचलेला गाळ उपसायला सुरुवात झाली आहे. आधीच नाल्यांमधील गाळ काढला असता तर कदाचित नगर परिषदेवर आता स्वच्छता करण्याची वेळ आली नसती. दुकानदारांचं नुकसान झाल्यानंतर नगर परिषद कामाला लागली आहे. त्यांनी कर्मचारी लावून नाल्यांच्या सफाईचं काम सुरू केलं आहे.

नागपूर जिल्ह्यात वीज कोसळून 3 ठिकाणी 3 मृत्यू

नागपुरात समाधानकारक अशा पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना पेरणीसाठी तयारी करा, अशा एकप्रकारे सूचना पावसाने दिल्या. मात्र काल नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वारे आणि विजांचा कडकडाटासह पाऊस झालां. त्यामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. एका बैलजोडीचा सुद्धा मृत्यू झाला. पाऊस आल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शहराचा विचार केला तर उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांसाठी वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मान्सून थोडा लेट जरी आला असला तरी सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या पेरणीनं वेग घेतला आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ