AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालघरमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ, तातडीनं 9 जिल्हाध्यक्ष बदलले, नवे पदाधिकारी कमाल करणार?

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत सुपडासाफ झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. पालघरसह 9 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे.

पालघरमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ, तातडीनं 9 जिल्हाध्यक्ष बदलले, नवे पदाधिकारी कमाल करणार?
प्रफुल्ल पाटील
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 6:33 PM
Share

पालघर: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत नंदूरबार आणि नागपूरमध्ये काँग्रेसनं चांगलं यश मिळवलं. मात्र, पालघर आणि धुळे जिल्ह्यात पक्षाचा सुपडासाफ झाला. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत सुपडासाफ झाल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याची गांभीर्यानं दखल घेतली आहे. पालघरसह 9 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे.

पालघरसह 9 जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष बदलले

रत्नागिरी ,गोंदिया ,पिंपरी चिंचवड ,अकोला शहर ,गडचिरोली ,जळगाव ग्रामीण ,पालघर ,कोल्हापूर शहर ,धुळे शहर येथे तात्काळ नऊ जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष यांच्या नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्याची जबाबदारी प्रफुल पाटील यांच्यावर पक्षाने सोपवली असून पालघर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षनेतृत्त्वाकडून तात्काळ संघटनात्मक बदल

पालघर जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा पुरता सुफडासाफ झाला असून सर्व उमेदवार पराभूत झालेत. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाने तत्काळ संघटनात्मक फेरबदल करत विद्यमान अध्यक्ष दिवाकर पाटील यांना पदावरून हटवले. त्यांच्या ऐवजी जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष संघटनात्म पातळीवर अत्यंत कमकुवत बनला आहे. एकेकाळी कॉंग्रेसचं वर्चस्व असलेल्या या जिल्ह्यात आता अस्तित्वच शिल्लक राहतं की नाही, अशी स्थिती आहे.

नुकताच झालेल्या जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचं पानिपत झालं. त्यामुळे पालघर जिल्हा कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याची दाट शक्यता होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्ल पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

सरपंच ते जिल्हाध्यक्ष प्रवास

सरपंच ते कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष असा प्रफुल्ल पाटील यांचा राजकीय प्रवास आहे. पक्ष नेतृत्वाने जिल्हाध्यक्षपदाची सोपविलेल्या जबाबदारीचं आपण स्वागत करत आहोत, असं प्रफुल्प पाटील म्हणाले. जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहता संघटनात्मक बांधणीवर अधिक लक्ष केंद्रीत करून जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष क्रमांक एकचा पक्ष करण्याचं मोठं आव्हान आहे. केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढून कॉंग्रेसपक्ष जिल्ह्यात उभा करू, असं प्रफुल्ल पाटील म्हणाले.

इतर बातम्या:

ZP निवडणुकीत बाजी मारली, आता महानगपालिकेसाठी प्लॅन तयार, नागपुरात काँग्रेसमध्ये उत्साह संचारला

Photo : पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष! शिवसेनेपेक्षा भाजप सरस, तर राष्ट्रवादीला झटका

Congress lost by election in Palghar Maharashtra Congress change 9 district president including Palghar

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.