AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“राज्याला 10 वर्षापूर्वी असाच भुलभूलय्या लोकांना दाखवला”; बीआरएसच्या सभेवरून ‘या’ नेत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला…

केसीआर यांच्याकडून महाराष्ट्रात सभा घेतल्या गेल्या तरी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचे टीका केली जात आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ती आता भाजपची बी टीम आहे का हा निष्कर्ष काढायला अजून अवधी असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याला 10 वर्षापूर्वी असाच भुलभूलय्या लोकांना दाखवला; बीआरएसच्या सभेवरून 'या' नेत्याने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 27, 2023 | 6:38 PM
Share

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून बीआरएस पक्षाच्या राज्यात काही ठिकाणी सभा होत असल्याने आता म यांच्या राजकारणाविषयी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या सध्या अनेक ठिकाणी जोरदार सभा होत आहेत. वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवून लोकांना प्रभावित करण्याचे कामही या पक्षाकडून केले जात आहे. त्यामुळे आता बीआरएस पक्षाच्या राज्यातील राजकीय वाटचालीवरून महाराष्ट्रातील नेत्यांनी बीआरएसवरून भाजपवर आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यासह देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी केसीआर यांच्या सभेविषयी बोलताना सांगितले की, केसीआर हे जी मांडणी करत आहेत तो भुलभुलय्या आहे का हे सर्वसामान्यांनी तपासून बघण्याची गरज असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

फक्त आमिष दाखवण्याचे काम

यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी आणि केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या ज्यावेळी भाजप सत्तेत आले आहे. त्या त्यावेळी लोकांना फक्त आमिष दाखवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे आमिष

राजू शेट्टी यांनी केसीआर यांच्याविषयी बोलताना म्हटले आहे की, केसीआर यांच्याकडून ज्या प्रकारे लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्यांच्या प्रमाणेच भाजप सत्तेत येण्यापूर्वी दाखवण्यात आला होता. मात्र दहा वर्षांपूर्वी असाच भुलभुलय्या लोकांना दाखवला गेला असल्याची खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली. ज्या प्रमाणे सध्या केसीआर आपल्या सभेतून लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवतात त्याच प्रमाणे आता बीआरएसकडूही दाखवण्यात येत आहे.

बीआरएसच्या घोषणा

ज्या प्रमाणे अच्छे दिन, गुजरात मॉडेल असं सांगितलं गेलं आहे. त्याच प्रमाणे हे सगळं फेल होतं ती आभासी प्रतिमा होती असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. त्यामुळे राज्यातील जनता आता पुन्हा बीआरएसच्या घोषणांना आणि आमिषांमुळे लोकांची फसगत होणार नाही याची खात्री सर्वसामान्य लोकांनी घेणे गरजेचे आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सभेवर होणारे वारेमाफ

यावेळी त्यांनी होणाऱ्या सभा आणि त्या सभेवर होणारे वारेमाफ खर्च बघून आता आमचे डोळेही दिपतात असा खोचक टोला त्यांनी भाजपबरोबरच बीआरएसला लगावला आहे. यावेळी त्यांनी राजकारण्यांकडे एवढे पैसे येतात कुठून असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

खर्च करते कोण

राजू शेट्टी यांनी आपल्या सभा घेताना कशा प्रकारची कसरत करावी लागते, ते सांगताना ते म्हणाले की, आम्हाला सभा घेण्यासाठी झोळी घेऊन भीक मागावी लागते, मात्र सत्ताधाऱ्यांना एवढ्या मोठ्या सभा घेताना आणि त्याचा खर्च करते कोण असा सवालही त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना उपस्थित केला.

बीआरएस भाजपची बी टीम

केसीआर यांच्याकडून महाराष्ट्रात सभा घेतल्या गेल्या तरी त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचे टीका केली जात आहे. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ती आता भाजपची बी टीम आहे का हा निष्कर्ष काढायला अजून अवधी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आताच बी टीम म्हणणे योग्य नाही कारण त्यांच्यासोबत कोण आणि कसं काम करतो हे पाहावे लागेल असंही त्यांनी यावेळी म्हटले.

शेट्टी यांना मोठी ऑफर

राजू शेट्टी यांनी सांगितले की, त्यांनी मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे ऑफर दिले होते, हजारो कोटीचं बजेट ही निवडणुकीसाठी देतो म्हणाले होते. मात्र मला कोणत्याही पक्षात जायचं नाही हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षाकडून मला कोणतही बोलावण आलं नाही मात्र ते किती गांभीर्याने होतं हे तपासले पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

Follow Us
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप
Sanjay Raut | सरकारचं हे दुटप्पी धोरण! ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा संताप; बापटांच्या भूमिकेला पाठिंबा
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
Dahi Handi in Mumbai | दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा पथकाने उत्सवातून समाजाला दिला मोठा संदेश
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली