.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तुमचा उत्साह बघुन नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी”; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एकाच वाक्यात उत्तर दिलं

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या बैठकीत पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सरकारचे सर्वसाधारण धोरण आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमचा उत्साह बघुन नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना एकाच वाक्यात उत्तर दिलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 13, 2023 | 9:33 PM
Share

कोल्हापूर : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यानिमित्ताने त्यांनी सरकारच्या योजना सांगत हे सरकार सर्वसामान्यांचे असल्याचा विश्वास नागरिकांना दिला. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देत कोल्हापूरकरांच्या भावनेलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा घातला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते.

कोल्हापूरकरांसमोर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, तुमचा उत्साह बघून नाद खुळा आणि विरोधकांचा टांगा पलटी झाला असेल या शब्दात त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज कार्यक्रम असल्याने कोल्हापूरातील तपोवन मैदानावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्या गर्दीला अनुसरुन एकनाथ शिंदे म्हणाले की, उच्चांकी गर्दी करून कोल्हापूरकरानी विषय हार्ड केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून जनसामान्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे हे सर्वसामान्यांच्या जिव्हाळचे सरकार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेल्या सर्व कॅबिनेटमध्ये सर्वसामान्यांच्या हितापेक्षा कोणताही दुसरा निर्णय घेतला नाही, तर अनेक नागरिकांच्या फायद्याचे निर्णय या सरकारने घेतले आहेत. आम्ही 29 सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. त्याचा फायदा नक्कीच राज्यातील वेगवेगळ्या भागातील लोकांना होणार आहे.

तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या बैठकीत पंधराशे कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे हे सरकारचे सर्वसाधारण धोरण आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील विकासाला गती मिळाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या नव्या धोरणामुळेच महाराष्ट्र राज्य उद्योग धंद्यात 11 महिन्यात महाराष्ट्र पुन्हा नंबर वनवर आला आहे असून या सरकारमुळे सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात जोरदार आंदोलन आणि निवेदन देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये खंडपीठ व्हावे यासाठी मुख्य न्यायाधीशांबरोबर बोलून तात्काळ हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जातीने प्रयत्न करणार असल्याचे अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Follow Us
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शदर पवार गटाचं विलीनीकर
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शदर पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी