AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“रब्बीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं तर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कपडे काढून मारा, अडचण आली तर फोन करा”

रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून मारा, त्यावेळी काही अडचण आली तर कधीही फोन करा", असं वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केलं आहे.

रब्बीत शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कापलं तर महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कपडे काढून मारा, अडचण आली तर फोन करा
रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी
| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 10:11 AM
Share

अमरावती : रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले तर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून मारा, त्यावेळी काही अडचण आली तर कधीही फोन करा”, असं वक्तव्य शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी केलं आहे. अमरावतीमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना तुपकर चांगलेच आक्रमक झाले होते.

शेतकरी अडचणीत असतांना शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा महावितरण कंपनीने सपाटा लावला आहे. आता रब्बी हंगाम सुरू आहे त्यामुळे या रब्बी हंगामात जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने कापले तर महावितरण कार्यालय जाळण्यास देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असंही रविकांत तुपकर म्हणाले.

महावितरण कर्मचाऱ्यांचे कपडे काढून फटकवाआणि वेळ पडली तर फोन करा

शेतकरी देशोधडीला लागलाय. अस्मानी आणि सुल्तानी संकाटाला सतत बळीराजा सामोरं जातंय. अशावेळी त्याला भक्कम पाठिंब्याची गरज आहे. मात्र संकटाच्या काळातच बळीराजाला अडचणीच आणण्याचं काम होत आहे. आता रब्बी हंगामात सरकार, महावितरण कंपनीला विनंती करा. विनंती करुनही वीज कनेक्शन कापले तर वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारा आणि वेळ पडली तर फोन करा, असं रविकांत तुपकर म्हणाले.

शेतकरी प्रश्नांवर राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढावा

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने केंद्र व राज्य सरकारने मार्ग काढावा, अशी मागणीही तुपकर यांनी केली. परतीच्या पावसामुळं व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मात्र तरी देखील सरकारने शेतकऱ्यांना पाहिजे तेवढी मदत केली नाही, त्यामुळे मी आता विदर्भ व मराठवाडाचा दौरा करतोय. 11 नोव्हेंबर पूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर केंद्र व राज्य सरकार विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन 12 नोव्हेंबर नंतर लढा उभारु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

(If the power connection is cut off, take off the clothes of MSEDCL officials Shetkari Sanghatna Ravikant Tupkar Controvercial Statement)

हे ही वाचा :

पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल? करोडो महिलांचा हृदय जिंकणारं राहुल गांधींचं उत्तर

मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा, महापौर मोहोळ यांचं पुणेकरांना पत्र

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.