AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडकमांजरीमध्ये 15 दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा, चार दिवस गावात अंधार, असं काय झालं की, गावातील दिवे पेटले

लोहा वीज वितरण कंपनीची अवकृपा झाली आणि ग्रामस्थाना अंधार राहावे लागले. लोहा वीज मंडळाचे उपअभियंता यांच्याबाबत तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी आहेत.

खडकमांजरीमध्ये 15 दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा, चार दिवस गावात अंधार, असं काय झालं की, गावातील दिवे पेटले
light
| Updated on: May 17, 2023 | 6:13 PM
Share

राजीव गिरी, प्रतिनिधी, नांदेड : उन्हाचा पारा वाढल्याने पंखा किंवा कुलरशिवाय राहवत नाही. शेताला विजेअभावी पाणी देता येत नाही. पण, वीजच नसेल, तर कसे करणार. गेल्या पंधरा दिवसांपासून गावात विजेचा खेळखंडोबा सुरू होता. त्यामुळे त्रस्त झाल्याने गावकऱ्यांनी तक्रारी केल्या. वरिष्ठांनी दखल घेतल्यानंतर गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला. लोहा शहराच्या जवळ असलेल्या कारेगाव शेवडी रस्त्यावरील खडकमांजरी गावात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेची समस्या आहे. चार दिवसांपासून गावात लाईट नव्हती. गावात रात्रीही सगळीकडे अंधारच अंधार होता. याची माहिती मिळाल्यानंतर भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे-चिखलीकर यांनी वीज मंडळाच्या वरिष्ठांशी थेट संवाद साधला. गावात तात्काळ वीज पुरवठा व्हावा, असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी खडकमांजरी येथे वीज पुरवठा सुरळीत झाला.

लोहा वीज वितरण कंपनीची अवकृपा

लोहा वीज वितरण कंपनीची अवकृपा झाली आणि ग्रामस्थाना अंधार राहावे लागले. लोहा वीज मंडळाचे उपअभियंता यांच्याबाबत तालुक्यातील जनतेच्या अनेक तक्रारी आहेत. सर्व सामान्य नागरिकांचे फोन उचलत नाहीत. कार्यालयात पूर्णवेळ राहत नाहीत, अशीच गत कनिष्ठ अभियंता यांची आहे.

तीन दिवसांपासून गाव अंधारात

या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची हेळसांड होते. एखादे गाव दहा-दहा दिवस अंधार राहते. तरी तेथे वीज सुरळीत होत नाही. लाईनमॅन तर ग्रामस्थांना जुमानत नाहीत. रात्री फोन घेत नाहीत, असा तक्रारी आहेत. गेल्या तीन दिवसांपासून खडकमांजरी हे गाव पूर्णतः अंधारात होते.

यांनी घेतला पुढाकार

गावातील माजी सरपंच पांडुरंग चौगुले, माजी चेअरमन खुशाल पाटील होळगे यांनी स्वतंत्रपणे याबाबत प्राणिताताई देवरे चिखलीकर यांना गावातील अंधाराबाबत सांगितले. त्यांनी तात्काळ वीज कंपनीच्या वरिष्ठांना खडकमांजरी येथील समस्या अवगत केल्या. रात्रीपर्यंत या गावात वीज सुरळीत झाली. गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.