AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर अतिसार आणि मळमळ, गावातील तब्बल 57 जणांना विषबाधा

गावातील लोक शुक्रवारी नेहमीच्या ठेल्यावर पाणीपुरी खायला गेले. पाणीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर आरोग्य विभागाने गावात धाव घेतली आहे.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर अतिसार आणि मळमळ, गावातील तब्बल 57 जणांना विषबाधा
नांदेडमध्ये पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 15, 2023 | 8:20 PM
Share

नांदेड / राजीव गिरी : नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांना पाणीपुरी खाल्ल्याने लोकांना विषबाधा झाली आहे. लहान बालकांसह गावातील तब्बल 57 जणांना विषबाधा झाली असून, त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात नेहमीच लावण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ल्यानंतर ही विषबाधा झाली. या सर्व रुग्णांवर गावात उपचार करण्यात आले असून, काही जणांना नांदेडला हलविण्यात आलंय. सर्वांची प्रकृती स्थिर असून, धोक्याबाहेर असल्याचं सांगण्यात आलंय.

बटाट्याच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा अंदाज

गावात हा पाणीपुरीचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून लावला जात आहे. बटाट्याच्या भाजीतून ही विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर सर्वांना मळमळ, उलट्या आणि अतिसार सुरू झाला. त्यामुळे त्यांना तातडीने चाभरा, अर्धापूर आणि नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

विषबाधा झालेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. आज सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाभरा येथे येऊन पाहणी केली. तसेच पाणीपुरी विकणाऱ्या व्यक्तीकडून पाणीपुरीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

पाणीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी अतिसार, उलट्या, मळमळ सुरु

नेहमीच्या ठेल्यावर 14 एप्रिल रोजी चाभरा गावातील गावकऱ्यांनी पाणीपुरी खाल्ली होती. पाणीपुरी खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांना मळमळ आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. काही जणांना उलट्या आणि अतिसार सुरू झाल्याने गावकरी घाबरून गेले. काही जणांना उलट्या आणि अतिसाराचे प्रमाण वाढल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. संदेश कदम, डॉ. जनार्धन टारफे, डॉ. मुस्तपुरे, आरोग्य सेविका टरके, सतीश जाधव आदींनी गावातील सर्व विषबाधित रुग्णांची तपासणी केली. चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 47, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात 8 आणि नांदेड येथे खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 11 लहान मुले तर 46 महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत