AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded | नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ!

जोरदार झालेल्या पावसामुळे नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत होते, परंतू पाऊस काही येत नव्हता. पुढील काही दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

Nanded | नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 2:56 PM
Share

मुंबई : मान्सून (Monsoon) यंदा 4 जूनला राज्यात दाखल होईल, असा अंदाजा हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकीचा ठरला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. आज सकाळी नांदेड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावली. यामुळे हवामान गारेगार झाले. दोन दिवसांपासून राज्यातील (State) काही शहरांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळाला. मात्र, नांदेडकडे पावसाने पाठ फिरवली होती. सकाळी अचानकच वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

नांदेडमध्ये वाऱ्यासह पावसाचे आगमन

जोरदार झालेल्या पावसामुळे नांदेडकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत होते, परंतू पाऊस काही येत नव्हता. पुढील काही दिवसांमध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली आणि देगलूर भागामध्ये आंबा आणि इतर फळबागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आताच्या पावसामुळे शेतकरी सुखावणार आहे. 4 जूनपासून राज्यात मान्सून दाखल होणार असा अंदाजा हवामान खात्याने वर्तवला होती. मात्र, दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्यास सुरूवात झालीये.

रेनकोट आणि छत्री खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

सकाळच्या वेळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची चांगलीच धावपळ झालीये. तसेच आता पावसाला सुरूवात झाल्याने रेनकोट आणि छत्री घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केलीये. 15 तारखेपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. यामुळे रेनकोट आणि छत्री खरेदी करण्यावर पालकांनी भर दिलायं. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील शाळा बंदच होत्या. विद्यार्थ्यांचे आॅनलाईन पध्दतीनेच सर्व शिक्षण सुरू होते. मात्र, आता कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आले आणि शाळा सुरू झाल्या. सध्या राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्याही झपाट्याने वाढताना दिसते आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...