AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवाब मलिक यांना भाजप ऑफर देऊ शकतो, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा; मलिक काय करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, ही आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे.

नवाब मलिक यांना भाजप ऑफर देऊ शकतो, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा; मलिक काय करणार?
nawab malikImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2023 | 12:15 PM
Share

जळगाव | 12 ऑगस्ट 2023 : अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना 17 महिन्यानंतर जामीन मिळाला आहे. अवघ्या दोन महिन्यांसाठी मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. आरोग्याच्या कारणास्तव मलिक यांना जामीन देण्यात आला आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर येत्या एक ते दोन दिवसात मलिक तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यामुळे मलिक अजितदादा गटात जाणार की शरद पवार गटात जाणार? मंत्रीपदी बसणार की राष्ट्रवादीचं काम करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मलिक यांच्या आगामी भूमिकेबाबत सस्पेन्स असतानाच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे बडे नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना एक मोठा दावा केला आहे. शरद पवार यांचे नवाब मलिक यांच्यावर उपकार आहेत. शरद पवार यांनी मलिक यांना राजकारणात अनेकदा संधी दिली आहे. मलिक यांचेही पक्षासाठी मोठं योगदान आहे. पण मलिक हे शरद पवार यांच्यासोबत राहतील यात शंका नाही. नवाब मलिक हे जर भाजपमध्ये केले तर ते स्वच्छ होऊन बाहेर येतील. त्यामुळे ते कुठे जाणार हे काळच ठरवेल. भाजप त्यांना पक्षात येण्यासाठी ऑफर देऊ शकतो, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

सरकारमध्ये भानगडी

खडसे यांनी यावेळी मंत्रिमंडळ विस्तारावरही टीका केली. भाजपा जवळ एक अशी मशीन आहे. माणूस घाणेरडा असला तरी या मशीनमध्ये स्वच्छ होतो. या तीन इंजिनच्या सरकारमध्ये आपसात अनेक भानगडी आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं जमत नव्हतं. त्यातच राष्ट्रवादी आल्यामुळे सत्तेची वाटणी झाली. तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरघोडी मोठ्या प्रमाणात आहे, असंही खडसे यांनी म्हटलं आहे.

सुटकेचा आनंद

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही नवाब मलिक यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला आहे. मलिक यांना 16 महिन्यानंतर मोकळा श्वास घेता येणार आहे. ट्रायल सुरू नसताना मलिक यांना 16 महिने आत ठेवण्यात आलं. हा कोणता कायदा आहे? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला आहे. तसेच एक इंजेक्शन मिळाल्यानंतर मलिक यांची सुटका करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राजकीय कारणांमुळे तुरुंगात

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मलिक यांच्या सुटकेचं स्वागत केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला, ही आनंदाची बाब आहे. न्यायालयाच्या या निकालाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. ते निर्दोष असून त्यांना केवळ राजकीय कारणांमुळे तुरुंगात ठेवण्यात आले आहे हे स्पष्ट आहे. आम्हा सर्वांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असून ते लवकरच दोषमुक्त होतील हा विश्वास आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.