AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…अन्यथा आम्हाला गोळ्या घाला;” रविकांत तुपकर का झालेत आक्रमक?

शेतकरी मोर्चास संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले, आमच्या मागणी मान्य करत नसाल तर बंदुकीच्या गोळ्या आमच्या छातीत घाला. आम्ही मरायला आलो आहोत हे लक्षात घ्या.

...अन्यथा आम्हाला गोळ्या घाला; रविकांत तुपकर का झालेत आक्रमक?
रविकांत तुपकर
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Feb 05, 2023 | 10:08 PM
Share

वाशिम : जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. पिकविमा (Crop Insurance), अतिवृष्टीची रखडलेली मदत व सोयाबीन-कापसाच्या दरवाढीची मागणी करण्यात आली. रखरखत्या उन्हातही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. पिकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना फसविले आहे. तसेच अतिवृष्टीची मदत जाहीर करूनही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा आरोप यावेळी रविकांत तुपकर यांनी केला. सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी केंद्र सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला नाही. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आता आर-पारच्या लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशाराही रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी दिला.

१० फेब्रुवारीपर्यंत सरकारने आमच्या मागण्यांसंदर्भात ठोस निर्णय घेतला नाही तर ११ फेब्रुवारी रोजी आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एकतर सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या नाहीतर आम्हाला गोळ्या घालाव्या, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला. तेथूनचं आंदोलनाचा भडका उडणार असल्याचंही त्यांनी म्हंटलं. या मोर्चाचे आयोजन स्वाभीमानीचे विदर्भ प्रमुख दामू अण्णा इंगोले यांनी केले होते.

आम्ही मरायला आलो आहोत

शेतकरी मोर्चास संबोधित करताना रविकांत तुपकर म्हणाले, आमच्या मागणी मान्य करत नसाल तर बंदुकीच्या गोळ्या आमच्या छातीत घाला. आम्ही मरायला आलो आहोत हे लक्षात घ्या.

कुणाच्या बापाला घाबरायचं नाही

मला तुम्हाला एकच सांगायचं आहे. कुणाच्या बापाला घाबरायचं नाही. आपण भीक मागायला येथे आलेलो नाहीत. आपण आपल्या बापाचा हक्क मागायला आलो आहोत. बापाच्या कामाचा दाम मागायला येथे आलो आहोत.

हक्क मागण्याचा प्रत्येकाला अधिकार

स्वातंत्र्याच्या काळातही क्रांतीकारकांनी आंदोलनं केलीत. महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचं हत्यार आमच्या हातात दिलं. जिथं अन्याय होईल त्या विरोधात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. हक्क मागण्याचा अधिकार आहे.

हक्क मागण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. पीकविमा मिळाला पाहिजे. सोयाबीनला योग्य भाव मिळाला पाहिजे. याशिवाय येथून हलायचं नाही, असा निर्धार यावेळी रविकांत तुपकर यांनी केला.

Follow Us
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.