VIDEO : रायगडमध्ये प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला मोठी आग, पाच तासाच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण

| Updated on: Nov 13, 2021 | 7:53 AM

खोपोली पाली रोडवरील एका कपंनीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. पण, कंपनीचं गोडाऊन या आगीत भस्मसात झालं आहे. त्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.

VIDEO : रायगडमध्ये प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीला मोठी आग, पाच तासाच्या प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण
Raigad Fire
Follow us on

रायगड : खोपोली पाली रोडवरील एका कपंनीत मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. पण, कंपनीचं गोडाऊन या आगीत भस्मसात झालं आहे. त्यामुळे कंपनीला मोठं नुकसान सोसावं लागलं आहे.

गोडाऊन पुर्णपणे जळुन खाक

उंबरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेंट सोल्युशन कपंनीला ही आग लागली. या आगीमध्ये गोडाऊन पुर्णपणे जळुन खाक झाले आहे. तर प्लाटंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर कपंनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते.

खोपोली फायर ब्रिगेड टीम, प्रसोल केमिकल फायर ब्रिगेड टीम, गोदरेज कपंनीची फायर फायटिगं टिमने पाच तासाच्या अथक प्रयत्नानतंर आगीवर नियत्रंण मिळविले. तरी गोडाऊनला लागलेली आग मात्र अद्यापही धुमसत आहे. प्लास्टिकवर प्रक्रिया उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली असल्याची माहिती आहे.

कपंनीच्या जवळून गेल इडिंयाची पाईप लाईन जात असल्याने गेल इडिंयाच्या फायर फायटिगं टीम सह खालापूर पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते

अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सस्थेंच्या टीमचे सदस्य असलेल्या केमीकल एक्सपर्ट धनजंय गीधसह गुरुनाथ साठीलकर, विजय भोसले, अमित गुजरे, अंकित साखरे, शैलेश आबंवणे, यतिन दळवी आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनीही मोलाची मदत केली.

आगीच्या घटनांमुळे महाराष्ट्र होरपळला

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत तब्बल 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच रज्य सरकारच्या कारभारावर मोठी टीका केली जाऊ लागली. राज्य सरकारला लक्ष्य केल्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नयेत म्हणून काय करायला हवं हे सांगितलं आहे. त्यांनी मास्टर प्लॅन सांगितला असून सर्व गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ICU विभागात CCTV मॉनिटरिंग केलं पाहिजे

“36 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र फायर ऑडिटसाठी पद दिलं पाहिजे. ICU विभागात CCTV मॉनिटरिंग केलं पाहिजे. जे या विभागात काम करतात त्यांना ट्रेनिंग दिले गेले पाहिजे. या सर्व गोष्टी अमलात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत,” असे राजेश टोपे म्हणाले.

संबंधित बातम्या :

आगीच्या घटनांमुळे महाराष्ट्र होरपळला, राजेश टोपे यांनी सांगितला ‘मास्टर प्लॅन,’ अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करणार

नगर आगीच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, राऊत सरकारवर भडकले, म्हणतात, अश्रू ढाळू नका, ‘काय पावलं उचलणार ते सांगा’