AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोर आला रे आला, चोरीच्या संशयाने घात केला, मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन जखमी

ते चोरीच्या उद्देशाने गावात आले असल्याचा ग्रामस्थांना संशय आला. या संशयावरून गावातील जमावाने तिघांना बेदम मारहाण केली.

चोर आला रे आला, चोरीच्या संशयाने घात केला, मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन जखमी
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: May 28, 2023 | 5:18 PM
Share

नजीर खान, प्रतिनिधी, परभणी : मध्यरात्री गावात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या संशयावरून तिघांना गावातील जमावाकडून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाल्याची घटना परभणीच्या उखळद येथे घडली. जमावाकडून तिघांना मारहाण करताना व्हिडीओही तयार करण्यात आला. घटनेनंतर जिल्ह्याभरात एकच खळबळ माजली आहे.

परभणी तालु्क्यातील उखळद या गावातून शनिवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास 3 युवक दुचाकीवर जात होते. ते चोरीच्या उद्देशाने गावात आले असल्याचा ग्रामस्थांना संशय आला. या संशयावरून गावातील जमावाने तिघांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ग्रामस्थांकडून पोलिसांना 112 नंबरवर बकरी चोर पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी घटनास्थळ गाठत तिघांना ताब्यात घेतले. तिघांपैकी एकाला अस्वस्थ वाटत असल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मारहाणीत जखमी झालेल्या गोरासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी याने ताडकळस पोलिसांना दिलेल्या तक्रारी वरून 8 अनोळखी तसेच इतरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळीव डुक्कर शोधण्यासाठी गेल्याची माहिती

व्हिडीओच्या माध्यमातून आणखीन आरोपी निष्पन्न करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी दिली. जखमींकडून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पाळीव डुक्कर शोधण्यासाठी तिघे उखळद या ठिकाणी गेले होते. गावातील काही जणांना ते तिघे चोरी करण्यासाठी आले असल्याचा संशय आला. त्यामुळे उखळद गावातून नवागडकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर गावातील काही लोकांनी संबंधितांना जबर मारहाण केली.

हे दोघे झाले जखमी

चोर समजून त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान किरपालसिंग सुरजित सिंग भौंड यांचा मृत्यू झाला, तर अरुणसिंग जोगीदसिंग टाक, गोरासिंग उर्फ सचिनसिंग गुरुबच्चनसिंग दुधाणी हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

दरम्यान, चोरीच्या संशयावरून बुधवारी मुंबईतही अशाच प्रकारची घटना घडली आहे. चोर समजून जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता.

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?