AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना”; सत्ताधाऱ्यांवर शेतकरी नेत्याचा घणाघात…

ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

'शासन आपल्या दारी' ही प्रचारी थाटाची कल्पना; सत्ताधाऱ्यांवर शेतकरी नेत्याचा घणाघात...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 12, 2023 | 8:00 PM
Share

कोल्हापूर : राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात कार्यक्रम घेत आहेत. त्यानिमित्ताने सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या प्रसारासाठी वेगळ्या प्रकारे त्याची जाहिरात केली जात आहे. त्यावरूनच स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात मंत्र्याचे दौरे सुरु आहेत. त्यावरूनच आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना आहे.

राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असताना सरकार फक्त योजनांच्या जाहिरातीबाजीवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असून या सरकारमुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे.

राज्यातील कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात आला आहे, तर कधी शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची ही परिस्थिती असतानादेखील सरकार मात्र योजनांच्या प्रसिद्धी मागे लागले असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केला आहे.

तर दुसरीकडे ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावरुन ते म्हणाले की, बदल्याचं रेटकार्ड मी जाहीर केलं होतं, पैसे देऊन बदल्या करून घेणारे अधिकारी नागरिकांना लुटत असतात. त्यामुळे आता उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुठल्या लाभधारकाने कुणाला किती पैसे दिले याची यादीच मी जाहीर करणार असा इशाराही त्यांनी सरकारला आला आहे.

Follow Us
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.