AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना”; सत्ताधाऱ्यांवर शेतकरी नेत्याचा घणाघात…

ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

'शासन आपल्या दारी' ही प्रचारी थाटाची कल्पना; सत्ताधाऱ्यांवर शेतकरी नेत्याचा घणाघात...
| Updated on: Jun 12, 2023 | 8:00 PM
Share

कोल्हापूर : राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील अनेक मंत्री वेगवेगळ्या भागात कार्यक्रम घेत आहेत. त्यानिमित्ताने सरकारकडून ‘शासन आपल्या दारी’ या योजनेच्या प्रसारासाठी वेगळ्या प्रकारे त्याची जाहिरात केली जात आहे. त्यावरूनच स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात मंत्र्याचे दौरे सुरु आहेत. त्यावरूनच आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. राजू शेट्टी म्हणाले की, ‘शासन आपल्या दारी’ ही प्रचारी थाटाची कल्पना आहे.

राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असताना सरकार फक्त योजनांच्या जाहिरातीबाजीवर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असून या सरकारमुळे राज्यातील शेतकरी संकटात आला आहे.

राज्यातील कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी मोठ्या संकटात आला आहे, तर कधी शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची ही परिस्थिती असतानादेखील सरकार मात्र योजनांच्या प्रसिद्धी मागे लागले असल्याचे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप केला आहे.

तर दुसरीकडे ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन करायला वेळ नाही आणि म्हणे हे गतिमान सरकार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, तुम्ही आमच्या दारात आला ठीक आहे पण आमच्या ऊस दरात काय? अनुदानाचं काय? असा सवालही त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे.

राजू शेट्टी यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरूनही त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यावरुन ते म्हणाले की, बदल्याचं रेटकार्ड मी जाहीर केलं होतं, पैसे देऊन बदल्या करून घेणारे अधिकारी नागरिकांना लुटत असतात. त्यामुळे आता उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर कुठल्या लाभधारकाने कुणाला किती पैसे दिले याची यादीच मी जाहीर करणार असा इशाराही त्यांनी सरकारला आला आहे.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.