AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत पंकजा मुंडेंच्या ऑफिसबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शने, पंतप्रधानांनी 12 कोटी जनतेची माफी मागण्याची काँग्रेसची मागणी

पंतप्रधान मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने मोदीविरोधी घोषणा दिल्या गेल्या. काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.

परळीत पंकजा मुंडेंच्या ऑफिसबाहेर काळे झेंडे दाखवून निदर्शने, पंतप्रधानांनी 12 कोटी जनतेची माफी मागण्याची काँग्रेसची मागणी
परळीत भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेसची निदर्शनं
| Edited By: | Updated on: Feb 09, 2022 | 12:24 PM
Share

संभाजी मुंडे|  बीड (परळी): पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र काँग्रेसवर केलेल्या आरोपांविरोधात आज राज्यभरात काँग्रेसच्या वतीने निषेधात्मक आंदोलन (Congress Agitation) करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेतून या आंदोलनाचे सूतोवाच केले होते. राज्यातील शहरा-शहरातील भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने केले जातील असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. त्यानुसार, परळीमध्येही आज भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.

काँग्रेस शहराध्यक्षांच्या नेतृत्वात आंदोलन

परळीत काँग्रेसचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धन्यवाद प्रस्तावावर काल बोलताना महाराष्ट्राचा अपमान केला. हा महाराष्ट्रातील 12 कोटीजनतेचा अपमान आहे. त्यामुळे मोदींनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी परळी शहर काँग्रेसच्या वतीने मोदीविरोधी घोषणा दिल्या गेल्या. काँग्रेसने आंदोलन करत काळे झेंडे दाखवून निदर्शने केली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी नाही मागितल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा येईल, असा इशाराही देण्यात आला.

पंतप्रधानांच्या कोणत्या वक्तव्याचा निषेध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. मात्र काँग्रेसवाले परिस्थिती बिघडण्याची वाट पहात होते. जागतिक आरोग्य संघटना सांगत होती की, लोकांनी आहे तिथेच थांबावे. परंतु काँग्रेसने तेव्हा महाराष्ट्रातील परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.

इतर बातम्या-

Video : मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला, पाय घसरुन पडला, चक्क डोंगराच्या मधोमध अडकला, 127 Hours सिनेमापेक्षाही भयंकर!

IND vs WI: रोहित शर्माकडे सिक्सर किंग बनण्याची संधी, एमएस धोनीचा मोठा रेकॉर्ड आज मोडित निघणार?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.