हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख, काळं फासणाऱ्यास 2 लाख; भाजप नेत्यांचं विधान

भारतीय जनता पार्टीकडून हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास १० लाखांचे तर काळे फासणाऱ्यास 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास 10 लाख, काळं फासणाऱ्यास 2 लाख; भाजप नेत्यांचं विधान
Harshwardhan sapkal
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 15, 2026 | 1:53 PM

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी केली. त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. आता भारतीय जनता पार्टीने हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास आणि त्यांना काळं फासणाऱ्यास लाखो रुपयांचे बक्षिस ठेवले आहे.

जीभ कापणाऱ्यास 10 लाख

अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीकडून हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच तोंडाला काळ फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजप आमदार नारायण कुचे यांनी केली. अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपने जोडे मारो आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात अनेकांनी सहभाग घेतल्याचे दिसत आहे. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप यांची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

जालन्यात भाजप नेते आक्रमक

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे जालन्यात देखील पडसाद उमटले आहेत. येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केला निषेध व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे ही कार्यकर्ते आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमदार नारायण कुचे,भास्कर दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपकडून सपकाळ यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

नाना पटोलेंनी फटकारलं

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष आहेत…असे म्हटले होते. यावर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं मला माहित नाही परंतु शिवाजी महाराजांची तुलना इतर कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती फक्त त्यांच्या नावातच लागतो असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.