AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संविधान धोक्यात नाही तर…’ , प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल

सध्या ईव्हीएमवरून राजकारण चांगलंच तापलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'संविधान धोक्यात नाही तर...' , प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा काँग्रेसवर हल्लाबोल
| Updated on: Dec 10, 2024 | 2:50 PM
Share

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी देखील झाला. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर विरोधकांकडून आता ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे, यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू असून या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील उडी घेतली आहे. मारकडवाडीमधील ग्रामस्थांकडून बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यांना परवानगी नाकारली, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच यावेळी त्यांनी काँग्रेसवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?  

ईव्हीएमविरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी सायंकाळी सहानंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स मागितले आहेत. आयोगाच्या उत्तराची वाट पाहात आहोत. मारकडवाडी सारखी परिस्थिती गावागावत आहे, गावागावत रोष आहे. मरकडवडी येथील गावकाऱ्यांचा बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या निर्णयाला आडवीण्याचा सरकार किंवा पोलिसांना आधिकार नाही. सरकारने मारकडवाडी येथील ग्रामस्थांना अडविल्याने संशय बळवतो की यांनी गडबड केली आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी मारकडवाडी या गावातील मतदान थांबाविण्याचा आदेश दिला होता का? याबाबत एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा. वेळ मिळाला तर मी मारकडवाडीला जाणार आहे. मी अनेकदा म्हटलं की हे ईव्हीएम पूर्वी काँग्रेसकडून पाडण्यासाठी वापरलं जात होतं. आता हे भाजपकडून निवडणुका जिंकण्यासाठी वापरलं जात आहे. सर्वोच्च न्यायालायचे न्यायाधीश ईव्हीएमचा मुद्दा बघायला तयार नाहीत. राज्यात आलेलं बहुमत हे ईव्हीएमचं बहुमत आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  संविधान खतरे में नाही तर काँग्रेस पक्ष खतरे में है. काँग्रेसने आम्हला बाहेर का ठेवलं? याचा पहिल्यांदा खुलासा करावा. आम्ही भाजप सोबत कधीही समजोता करणार नाही, हे आम्ही ठरवलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.