AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणजे मूठभर लोकांच्या हाती सत्ता देणे: दरेकर

भाजप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियोजनबद्धपणे तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर आणि गोव्यातील निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्याचे दरेकर यांनी सांगितले. | Pravin Darekar

म्हणजे मूठभर लोकांच्या हाती सत्ता देणे: दरेकर
यापुढील काळात भारताची ओळख अयोध्येतील राम मंदिरावरून होणार आहे. या पार्श्वभूमीवर माधव भांडारी यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून नवीन माहिती वाचनास मिळेल, असे दरेकर यांनी ट्विट करत पुस्तकाबद्दल आपले मत व्यक्त केले.
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 15, 2021 | 8:06 PM
Share

रायगड: राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत (Grampanchyat election) भाजप (BJP) मोठी मुसंडी मारेल, असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी वर्तविले आहे. सध्या देशभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला प्रचंड यश मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपला अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. (BJP will get major success in Gram Panchayat election in Maharashtra)

ते बुधवारी रायगडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशाचा हवाला देत ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयाचा दावा केला. अपवादात्मक विधानपरिषद निवडणुकीत भाजपला एक-दोन जागा गमवाल्या लागल्या. परंतु, भाजप ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियोजनबद्धपणे तयारी करत आहे. नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर आणि गोव्यातील निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्याचे दरेकर यांनी सांगितले.

‘ठाकरे सरकार भांबावले आहे, लोकाभिमुख निर्णय घेत नाही’

ठाकरे सरकार हे भांबावले आहे. यापूर्वी भाजपने लोकाभिमुख दृष्टीकोनातून निर्णय घेतले. मात्र, ठाकरे सरकार राजकीय हेतूने निर्णय घेत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

भाजप सरकारच्या काळात सरपंचपदासाठी थेट निवडणूक होती. त्यामुळे जनतेला थेटपणे योग्य उमेदवार निवडून आणता येत होता. त्यामध्ये घोडेबाजाराची शक्यता नव्हती.

सरपंचपदासाठी निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर झाले असते तर गुणवत्तापूर्ण उमेदवार मिळाला असता. त्यांनी आपापल्या गावांमध्ये चांगल्याप्रकारे काम केले असते. पण निवडणुकीनंतर आरक्षण जाहीर करणे म्हणजे निवडून आलेल्यांपैकी एकाची निवड करणे. राज्य सरकारला लोकाभिमुख कारभार नको आहे. दबावामुळे काही मुठभर लोकांच्या हाती कारभार देण्याचा विचार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

2020-21 च्या निवडणुकीत कोणते दोन बदल ?

1. सरपंच-उपसरपंचाचे आरक्षण निकालानंतर होणार. 14 फेब्रुवारीच्या आत आरक्षण निश्चिती 2. राखीव जागांवरील उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोचपावती वा अर्ज केल्याचा पुरावा पुरेसा

उमेदवारी अर्ज भरताना काय काय हवे ?

1. उमेदवाराने वयाची 21 वर्षे पूर्ण केली असल्याचा जन्मतारखेचा पुरावा 2. अंतिम मतदार यादीत नाव असलेला उतारा 3. उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपात्र ठरवलेले नसावे 4. अपत्य किती आहेत याचे प्रमाणपत्र 5. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र 6. मालमत्ता आणि दायित्वाचे प्रमाणपत्र 7. ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसल्याचे, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र 8. घरी शौचालय असून वापर करत असल्याचे हमीपत्र 9. राखीव जागांवरील उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र वा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा पुरावा 10. डिपॉझिटची रक्कम भरल्याचा पुरावा 11. महिला उमेदवारांनी माहेरचे जातप्रमाणपत्र असल्यास 100 रुपयांच्या बाँडवर शपथपत्र 12. टीसी किंवा सनद आदी शैक्षणिक पुरावे 13. आधार आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र 14. ग्रामसेवकांनी दिलेले रहिवासी प्रमाणपत्र

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

सरपंच आरक्षण सोडतीला विरोध, हायकोर्टात याचिका, इच्छुकांची धाकधूक वाढली

(BJP will get major success in Gram Panchayat election in Maharashtra)

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ