AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात रविवारी उद्घाटनांचा धडाका; एकट्या अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी नारळ फुटणार

सध्या येणाऱ्या काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या अतिशय महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली सारी ताकद पणाला लावली आहे.

पुण्यात रविवारी उद्घाटनांचा धडाका; एकट्या अजित दादांच्या हस्ते 29 ठिकाणी नारळ फुटणार
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार. (सौजन्यःगुगल)
| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 11:15 AM
Share

पुणेः सध्या महापालिका निवडणुकीचा हंगाम आहे. ओबीसी आरक्षणामुळे तूर्तास दोन-तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या जातीलही. मात्र, हा वेळ राजकीय तयारीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. तेच ध्यानात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रविवारी 13 मार्च रोजी पुण्यात (Pune) उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका लावणार आहेत. त्यांच्या हस्ते एक, दोन, तीन नव्हे तर चक्क 29 ठिकाणी उद्घाटनांचा नारळ फुटणार आहे. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या विविध कामांचे लोकार्पण अजित दादांच्या हस्ते होणार आहे. अगदी सकाळी सातपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दिवशी अजितदादा काय बोलणार याकडे आत्तापासूनच लक्ष लागले आहे. सध्या येणाऱ्या काळात राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या अतिशय महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपली सारी ताकद पणाला लावली आहे.

फडणवीसांचेही कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे रविवारी पुण्यात कार्यक्रम आहेतच. सोबत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याही हस्ते विविध कामांचे उद्घाटन होणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते पाच ते सहा कार्यक्रमांचे उद्घाटन होणार असल्याचे समजते. हे दोन्ही दिग्गज एकाच दिवशी पुण्यात असल्यामुळे ते काय बोलतात, एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतात का, हे पाहावे लागले. काहीही असो. मात्र, पुण्यात होळी आधीच रविवारी राजकीय धुळवड रंगलेली पाहायला मिळणार आहे.

लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी

पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच खरी लढत होणार आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश झाल्यामुळे जागा आणि मतदारांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे या गावांचा कौल ज्या पक्षासोबत राहणार तो पक्ष महापालिकेच्या सत्तास्थानी बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकाचे सारे अधिकार राज्य सरकारने स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका या तीन ते चार महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

असे आहे पक्षीय बलाबल

– भाजप – 99 – राष्ट्रवादी – 42 – काँग्रेस – 10 – शिवसेना – 10 – मनसे – 2 – एमआयएम – 1 – एकूण जागा – 164

इतर बातम्याः

Nashik | उद्योजकाच्या घरावर दरोडा; बाळाच्या मानेवर सुरा ठेवून 50 तोळे सोने लुटले, महिलांचे तोंड चिकटपट्टीने बंद!

नाशिक – दिंडोरी सिटी बस सुरू; गामीण भागात वाढवला विस्तार, मार्ग काय राहणार?

नाशिककरांना दिलासा; 4 वर्षांपूर्वी केलेली अव्वाच्या सव्वा करवाढ निवडणुकीच्या तोंडावर मागे!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.