AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार गटाकडून ‘या’ आमदारांना फोन, काय दिला संदेश

Ajit Pawar and Sharad Pawar : शरद पवार यांच्या गटाकडून काही आमदारांना फोन केले जात आहे. या आमदारांना फोन करुन महत्वाचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटात पुन्हा रस्सीखेच होणार आहे.

शरद पवार गटाकडून 'या' आमदारांना फोन, काय दिला संदेश
इथेच काका-पुतण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
| Updated on: Jul 13, 2023 | 11:41 AM
Share

योगेश बोरसे, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी मोठी घटना घडली. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत सरळ आपला वेगळा गट तयार केला. या गटातील ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ २ जुलै रोजी घेतली. या सर्व घडामोडी सुरु असताना अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. त्यावेळी अजित पवार यांच्या गटाकडून ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांना कोणता झेंडा घेऊ मी हाती…हा प्रश्न पडला आहे.

शरद पवार गट सक्रीय

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार द्विधा मनस्थितीत आहेत. या आमदारांवर शरद पवार यांच्या गटाने लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून अजित पवार गटाच्या वाटेवर असलेल्या आमदारांना संदेश दिला जात आहे.

काय आहे संदेश

राज्यातील जे आमदार द्विधा परिस्थितीत आहेत, त्यांना फोन केले जात आहे. ठोस भूमिका घ्या, संघर्षाची भूमिका ठेवा, योग्य निर्णय घ्या विचार करून कळवा, हा निरोप आमदारांना देत आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश येईल, हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु काठावर असलेल्या आमदारांना शरद पवार गटात आणण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहे, हे यामुळे स्पष्ट झाले आहे.

काही दिवसांत स्पष्ट होणार भूमिका

अजित पवार यांच्या गटातील नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यानंतर अजून काही जणांना मंत्री होण्याची आशा आहे. यामुळे सत्तेत राहण्याचा प्रयत्न काही आमदारांकडून आहे. द्विधा मनस्थितीत असणाऱ्या आमदारांनी यामुळे अजून ठोस भूमिका घेतली नाही. परंतु काही दिवसांत त्यांची ही भूमिका स्पष्ट होणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.