AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

31 मार्चला उरले काही दिवस, आधी ही कामे करुनच घ्या

आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवस राहिले आहे. आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी बँका सुरु राहणार आहेत. सरकारी पातळीवर धावपळ असली तरी सर्वसामान्यांनाही आपली अशी कामे आहेत, जी पूर्ण करावी लागणार आहे. अन्यथा दंड होणार आहे.

31 मार्चला उरले काही दिवस, आधी ही कामे करुनच घ्या
| Updated on: Mar 23, 2023 | 9:45 AM
Share

पुणे : आर्थिक वर्ष संपण्यास आता काही दिवसच उरले आहेत. यामुळे सरकारी पातळीवर धावपळ सुरु आहे. विविध विभागांना दिलेले बजेट खर्च करण्याचा प्रयत्न त्या-त्या विभागाकडून सुरु आहे. त्याचवेळी बँकांमध्ये आपली आर्थिक वर्षाची कामे पूर्ण करण्याची लगबग सुरु आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी 31 मार्च रोजी बँका सुरु राहणार आहेत. परंतु सर्वसामान्यांनाही आपली अशी कामे आहेत, जी पूर्ण करावी लागणार आहे. 31 मार्चपूर्वी ही कामे पूर्ण केल्यास तुमचा तोटा होऊ शकतो. कोणती कामे 31 मार्चपूर्वी करावी, जाणून घेऊ या.

कोणती आहेत कामे  

तुमचे पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (PPF) व सुकन्या समृद्धि योजना (SSY) खाते असेल अन् त्यात या आर्थिक वर्षात काहीच भरणा केला नसेल तर आता करुन घ्या. कारण तुमचे हे खाते सक्रीय ठेवण्यासाठी दरवर्षी त्यात भरणा करणे गरजेचे आहे. अन्यथा तुमचे खाते सक्रीय राहणार नाही आणि तुम्हाला दंडही भरावा लागणार आहे.

पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF)

PPF खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षांत कमीत कमी 500 रुपये टाकले गेले पाहिजे. जर तुम्ही ही रक्कम भरली नाही तर तुमचे खात सक्रीय राहणार नाही. यावर्षी 31 मार्च 2023 पर्यंत तुम्हाला हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या खात्यात तुम्हाला 7.1% टक्का व्याज मिळते.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

सुकन्या समृद्धी योजनेत तुमचे खाते असेल तर त्यात दरवर्षी 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. या खात्यावर तुम्हाला 7.6% व्याज मिळते. जर तुम्ही हे पैसे जमा केले नाही तर दंड लागणार आहे.

पॅन-आधार लिंक

आधार कार्ड-पॅन कार्ड जोडणीची अंतिम मुदत 31 मार्च 2023 आहे. गेल्या वर्षीच केंद्र सरकारने याविषयीची घोषणा केली होती. सध्या 1000 रुपयांच्या दंडासह ही मुदत दिली आहे . आता 31 मार्चपर्यंत हे काम न केल्यास तुमचे पॅन कार्ड रद्द होण्याचा मोठा धोका आहे.

या ठिकाणी दिलासा

केंद्र सरकारने व्होटर आयडी आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. यापूर्वी ही तारीख १ एप्रिल २०२३ होती. ती आता ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे. आधार कार्ड आणि व्होटर आयडी लिंक करणे आवश्यक आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.