AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : आता पुणे शहराचं नामंतर होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र हिंदू महासंघानं त्याला विरोध केलाय.

VIDEO : आता पुणे शहराचं नामंतर होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 13, 2023 | 11:54 PM
Share

पुणे : नामांतरांच्या मागण्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा पुण्याची (Pune) भर पडलीय. संभाजी ब्रिगेडनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पुण्याचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र हिंदू महासंघानं त्याला विरोध केलाय. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर प्रक्रियेत आहे. त्यात अहमदनगर आणि पुन्हा एकदा पुण्याच्या नामांतराची चर्चा सुरु झालीय. पुण्याचं नाव बदलून ते जिजापूर करावं , अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीय. मात्र या नामांतराच्या मागणीवरुन राष्ट्रवादी आणि हिंदू महासभा एकमेकांसमोर येण्याची चिन्हं आहेत. याआधी संभाजी ब्रिगेडनं पुण्याचं नाव जिजापूर किंवा जिजाऊनगर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता अमोल मिटकरींनी पुण्याला जिजापूर करण्याची मागणी केलीय. मात्र पुण्याचं नाव पुणेच राहावं, अशी भूमिका हिंदू महासभेनं घेतलीय.

नामांतराचे समर्थक म्हणतात की, जिजामातांच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी पुण्याचं वैभव परत आणलं. विरोधकांच्या मते, राजमाता वंदनीय आहेत. पुण्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र पुणे नाव पुण्येश्वर महादेवामुळे पडलं, त्यात बदलाची गरज नाही.

समर्थकांच्या मते शिवरायांना घेऊन जिजामाता पुण्यात आल्या, आणि पुणे जिल्ह्यातूनच पुढे स्वराज्याची स्थापना झाली.

विरोधकांच्या मते स्वतः शिवभक्त असूनही शिवरायांनी पुण्याचं नाव बदललं नाही. नामांतराची परंपरा भारतात काही नवीन नाही. अगदी मुगल काळापासून शहरांची नावं बदलत आली आहेत.

उदाहरणार्थ सोळाव्या शतकात औरंगाबादचं नाव खडकी होतं. 1660 मध्ये मलिक अंबरनं मुलाचं नाव म्हणून त्याला फतेह नगर केलं. औरंगजेब दख्खनमध्ये आल्यानंतर फतेहनगरचं औरंगाबाद झालं. आणि एकविसाव्या शतकात औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय झाला.

90 च्या दशकात बॉम्बेचं मुंबई, मद्रासचं चेन्नई आणि कलकत्त्याचं कोलकाता झालं.

2014 नंतर जर शहरं नामांतराची यादी काढली, तर देशातल्या जवळपास 25 शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. खासकरुन उत्तर प्रदेशात अजून 12 जिल्ह्यांचं नामांतर प्रस्तावित आहे.

अलीनगरचं आर्यनगर, फैजाबादचं अयोध्या आणि इलाहाबादलचं प्रयागराज ही नामांतरं झाली आहेत. याशिवाय अलीगढचं हरिगड, फिरोजाबादचं चंद्रनगर, आग्र्याचं अग्रवन, गाजीपूरचं गढीपुरी, देवबंदचं देववृंदपूर अशी नामांतर प्रस्तावित आहेत.

भाजप नेहमी शहरं किंवा रस्ते नामांतरावर आग्रही असल्याचा आरोप होतो. मात्र 2013 सालमधल्या एका आरटीआयनुसार सर्वाधिक नामकरणं काँग्रेस काळातच झालीयत.

रस्ते, विमानतळं, संस्था, मैदानं, दवाखाने असे मिळून जवळपास साडे 400 ठिकाणांना जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचं नाव दिलं गेलं.

सत्ताधारी असोत की मग विरोधक, नामांतरांच्या मुद्द्यााला निवडणुकांच्या तोंडावरच फोडणी दिली जाते. याआधी औरंगाबादचं नामांतर महाराष्ट्राच्या अनेक निवडणुकांसाठी पुरलं. आता अहमदनगरच्या नामांतराला पुन्हा पुणे शहराची जोड मिळालीय.

Follow Us
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?