AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या अडचणीत भर, महायुतीत आणखी एक पक्ष आक्रमक, जागावाटप ठरणार डोकेदुखी

shiv sena bjp alliance : शिवसेना-भाजप महायुती आहे. आगामी निवडणूक महायुतीमधील सर्वच पक्ष एकत्र लढवणार आहे. परंतु महायुतीमधील सर्वच पक्षांनी आपली मागणी लावून धरली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत जागावाटप भाजपपुढे डोकेदुखी होणार आहे.

भाजपच्या अडचणीत भर, महायुतीत आणखी एक पक्ष आक्रमक, जागावाटप ठरणार डोकेदुखी
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 30, 2023 | 1:56 PM
Share

प्रदीप कापसे, पुणे : निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप-शिवसेना युतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 22 जागांची मागणी केली आहे. त्यानंतर महायुतीमधील लहान पक्षांनीही वाढवून जागा मागितल्या आहेत. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 15 ते 16 जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहारला उमेदवारी मिळावी यासाठी दावा ठोकणार असल्याच बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. आता महायुतीमधील आणखी एका पक्षाने दावा केलाय.

काय केला दावा

महाराष्ट्रात लोकसभेला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्षाला 5 जागा हव्यात. टीव्ही 9 च्या माध्यमातून महादेव जानकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महादेव जानकर म्हणाले की, आम्हाला लोकसभेला 5 जागा मिळाल्या नाहीत तर महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार आहे.

शिंदे गटाची काय आहे तयारी

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत शिवसेना खासदारांची नुकतीच बैठक झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जागावाटपाच्या सूत्रानुसार शिवसेना 48 पैकी 22 जागा लढवणार असल्याचा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली होती. या बैठकीनंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी ही माहिती दिली.

बच्चू कडू काय म्हणाले होते

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 ते 16 जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदार संघात प्रहारला उमेदवारी मिळावी यासाठी दावा ठोकणार असल्याच बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोणी कितीही दावा ठोको तो दावा खोडून काढण्याची ताकद आमदार रवी राणांमध्ये आहे. तसेच दिवसा स्वप्न पाहू नये रात्री स्वप्न पहावे… असा टोलाही आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी लगावला होता.

Follow Us
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला एकामागून एक मोठे धक्के बसणार
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी?
सचिन आहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटात नाराजी? नीलम गोऱ्हे थेट म्हणाल्या...