AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad Ashish Shelar : भारनियमनाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार, आंदोलन करणार; आशिष शेलारांचा इशारा

आधी अघोषित भारनियमन होते. आता तर मंत्र्यांनी अधिकृत केले आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे.

Pimpri Chinchwad Ashish Shelar : भारनियमनाला राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार जबाबदार, आंदोलन करणार; आशिष शेलारांचा इशारा
वीजप्रश्नी राज्य सरकारवर टीका करताना आशिष शेलारImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 22, 2022 | 12:09 PM
Share

पिंपरी चिंचवड : राज्यात भारनियमन (Load Shedding) विषय जोरात आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. आधी अघोषित भारनियमन होते. आता तर मंत्र्यांनी अधिकृत केले आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली आहे. वीजप्रश्नावर पिंपरी चिंचवडमध्ये ते बोलत होते. यासंबंधी भाजपा आक्रमक असून आता आंदोलनही (Agitation) करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, सरकारचा नियोजनशून्य कारभार वीजटंचाईस कारणीभूत आहे. या भारनियमनावर सर्व आदळ-आपट केंद्राच्या नावाने सुरू आहे. भारनियमनासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली, आमचा थेट आरोप आहे. देखभाल दुरुस्ती उन्हाळ्याआधी करता येते. ती का नाही केली. कोळशाच्या देशभराच्या उचलमध्ये तुम्ही स्टॉक घ्या असे सांगण्यात आले होते. त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने का नाही भूमिका घेतली, असा सवाल त्यांनी केला.

‘टक्केवारीचा प्रकार सुरू’

पुढे ते म्हणाले, की मागणी आणि पुरवठा यात टंचाई आणि टक्केवारी असा प्रकार सुरू आहे. सरकार टंचाई निर्माण करत आहे. यात टंचाई निर्माण करायची आणि खासगी कंपन्यांनाकडून वीज घ्यायची. देखभाल दुरुस्तीसाठी वीज बंद केली. त्यात 27 केंद्रे बंद करण्यात आली. सरकारी खात्यात हजारो कोटींची थकबाकी आणि सामन्याकडून थकले की वीज कट करायची हा कुठला कारभार, असा सवाल यावेळी त्यांनी केला.

‘आम्ही नियोजन केले’

सरकारी खात्याने वीजबिले भरली नसतील तर संबंधित खात्यातील वीज किती वेळ बंद ठेवणार, असे विचारत जाणूनबुजून हे सर्व होत असल्याचे ते म्हणाले. आता याचप्रकरणी उद्यापासून राज्यभरात टप्याटप्याने आंदोलन होणार आहे. तीन पक्ष आणि त्यात नसलेला समन्वय याचे दुष्परिणाम महाराष्ट्र भोगत आहे. शेतकऱ्यांकडून 48 हजार कोटी वीजबिले येणे असतानासुद्धा आमच्या काळात कंपन्या नफ्यात गेल्या. कारण आम्ही नियोजन केले, असे ते म्हणाले.

आणखी वाचा :

राऊतांचं ‘रहाटे’ तर खडसेंचं ‘खडसणे’! फोन टॅपिंगआधी देण्यात आलेल्या नावांबाबत सगळ्यात मोठा खुलासा

राजकीय हेतूनं कृष्ण प्रकाश यांची बदली; पिंपरी चिंचवडच्या रिपब्लिकन युवा मोर्चानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पाठवला मेल

Raj Thackeray Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेची तारीख बदलणार? पोलिसांची मनसे कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.