AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार, किती दिवस राहणार थंड वारे

weather Update | राज्यात डिसेंबर महिने सुरु झाल्यानंतर थंडी जाणवत नव्हती. आता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात थंडी जाणवू लागली आहे. परंतु यंदा थंडीवर एल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे यंदा थंडी नेहमीसारखी नसणार नाही. पुढील 48 तासात महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे.

राज्यात पुढील ४८ तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार, किती दिवस राहणार थंड वारे
| Updated on: Dec 22, 2023 | 8:54 AM
Share

प्रदीप कापसे, पुणे, दि.22 डिसेंबर | राज्यात आता अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक शहरांचे तापमान सातत्याने 10 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आले आहे. वाढत्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटविल्या जात आहे. आता हवामान विभागाने थंडीसंदर्भात अपडेट दिले आहे. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. थंडीचा हा जोर वर्षाच्या अखेरपर्यंत कायम राहणार आहे. अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे थंडी निर्माण झाली आहे. सध्या उत्तरेकडे थंड वारे सुरु असून त्याचा प्रवास राज्याचा दिशेने सुरु झाला आहे. या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. थंडी आणण्यासाठी कमी दाबक्षेत्रेही सध्या मध्य प्रदेशसह महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

विदर्भ मराठवाड्यात गारठा राहणार

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. पुणे शहरात सकाळच्या धुक्यातही वाढ झाली आहे. पुण्यात ही थंडीचा प्रभाव जाणवत आहे. पुणे शहराचे तापमान १४. ९ अंशावर आहे. राज्यात सर्वात कमी तापमान विदर्भात नोंदवले गेले. गोदिंयाचे तापमान ९ अंश सेल्सियस होते. मुंबईतील तापमान २३.२ अंशावर आले असली तरी सकाळी गार वारे वाहत आहेत. यामुळे समुद्र किनारी फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. नागपूरचे तापमान १०.६ तर नाशिकचे तापमान १५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले.

रब्बी पिकास फायदा

राज्यात गेल्या चार पाच दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे. यामुळे रब्बी पिकाला फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाच्या ओलांव्यामुळे गव्हामध्ये पिवसळपणा जास्त प्रमाणात दिसून येत होता. मात्र, आता थंडीची चाहूल लागताच गव्हाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. तापमानात सातत्याने चढउतार होत असल्याने काही भागात दाट धुके सुद्धा पडत आहे. या धुक्यांमुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तरी निसर्गाची साथ मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे.

Follow Us
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने..
तमिळनाडूत टीव्हीकेचा सत्तास्थापनेसाठी दावा, काँग्रेसच्या पाठिंब्याने...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत...
मोठी अपडेट! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला, भाजपच्या विजयी रॅलीत....
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर...
पंढरपूरात राधा पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा; बाचाबाचीचे रूपांतर....
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत...
नसरापूर प्रकरणातील आरोपीचा माथं टणकावणारा जबाब, म्हणाला, मी नशेत....