AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?

पुण्यात (Pune) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारला जात असला तरी दंड वसूल होण्याची प्रमाण मात्र कमी आहे. पुणेकरांच्या वाहनांवर अद्यापही कोट्यवधींचा दंड बाकी आहे.

पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?
(प्रातिनिधिक फोटो)
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 4:21 PM
Share

पुणे : पुण्यात (Pune) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर (Traffic Rules Violation) ई-चलनच्या (E Challan) माध्यमातून दंड आकारला जातो. त्यासाठी शहरातल्या चौकाचौकात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ई-चलनच्या माध्यमातून दंड आकारला जात असला तरी दंड वसूल होण्याची प्रमाण मात्र कमी आहे. पुण्यात ई-चलनच्या माध्यमातून आतापर्यंत 77 कोटी 52 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात 10 कोटी 45 लाखांची दंडाची रक्कम वसूल झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वाहनांवर अद्यापही कोट्यवधींचा दंड बाकी आहे. (corers of e-challan fines are due for violating traffic rules on Punekar’s vehicles)

दंड वसूल न होण्याची कारणं

ई-चलनचा मेसेज आल्यानंतर त्याकडे दु्र्लक्ष करणं हे दंड वसूल न होण्याचं एक महत्वाचं कारण आहे. अनेकजण ई-चलनच्या मेसेजकडे दुर्लक्ष करत दंड भरण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत जात आहे. यासोबतच अनेकांच्या वाहनांना लिंक मोबाईल क्रमांक आणि सध्या वापरात असलेला मोबाईल क्रमांक वेगळा आहे. त्यामुळे वाहनांनी नियम मोडल्यानंतर सध्या वापरात असलेल्या मोबाईलवर ई-चलनचा मेसेज जात नाही.

शिवाय काही जण बनावट नंबर प्लेट लावून वाहनं चालवत असल्याचंही समोर आलं आहे. अशा वाहनांनी नियम मोडले तर नंबर प्लेट असलेल्या मूळ मालकाच्या मोबाईलवर ई-चलनचा मेसेज जातो. त्यामुळे तो दंड भरला जात नाही. सोबतच वाहन विकल्यानंतर अनेकजण आरटीओमध्ये मोबाईल नंबर अपटेड करत नाही. त्यामुळे जुन्या वाहनमालकाला दंडाची पावती जाते.

तुमच्या वाहनावर दंड नाही ना?

पोलिसांनी एखादं वाहन पकडल्यानंतर त्याची तपासणी केली जाते. त्या वाहनावर किती दंड आहे हे पाहिलं जातं. त्यावेळी वाहनचालकांना वाहनावर जास्त दंड असल्याचं समजतं. मात्र, अशावेळी दंड भरण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे आपल्या वाहनावर किती दंड आहे याची खातजमा करत राहणं गरजेचं आहे. शिवाय ई-चलनचा मेसेज आल्यास तो लगेच भरल्यास दंडाची रक्कम साचून राहत नाही.

कसा आकारलं जातं ई-चलन?

शहरातल्या चौका-चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामाध्यमातून शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर लक्ष ठेवलं जातं. हे काम वाहतूक शाखेच्या येरवडा इथल्या नियंत्रण कक्षातून चालतं. विना हेल्मेट गाडी चालवणं, सिग्नल तोडणे इ. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेवली जाते. त्यानंतर त्यांचा फोटो काढून वेळ, ठिकाण यांची नोंद ठेवली जाते. ही माहिती मुंबईच्या नियंत्रण कक्षाला पाठवण्यात येते. तिथून नियम मोडणाऱ्या वाहन क्रमांकाच्या मालकाला ई-चलनचा मेसेज पाठवला जातो.

संबंधित बातम्या :

31 ऑगस्टपूर्वी कागदपत्रांची तपासणी करा, अन्यथा सदनिका रद्द! PMRDAचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा इशारा

पुणे महापालिकेच्या ‘अभय योजने’ला अत्यल्प प्रतिसाद, मुदत संपल्यावर होणार धडक कारवाई, कसा कराल अर्ज?

PMRDA विकास आराखड्यावर साडेआठ हजार हरकती दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मुदत, कशा दाखल कराल हरकती आणि सूचना?

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.